हिंदूधर्मामध्ये व्रत किंवा उपवास करण्याला खूप महत्त्व दिलं जातं.उपवास करताना आपण काय खातोय याकडे विशेष लक्ष दिलं जातं.
उपवास करताना काही पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले गेले आहे. उपवास केल्यास कांदा, लसू आणि कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ खाण्यास बंदी असते.
धर्मानुसार खाद्यपदार्थांचे तीन विभाग करण्यात आले आहेत. पहिला सात्विक, दुसरा रासिक आणि तिसरा म्हणजे तामसिक.
सात्विक पदार्थांमध्ये दूध, मैदा, तूप, भाज्या, फळे या सर्व गोष्टींचा समावेश असतो. या पदार्थांचे सेवन केल्यास मन सात्विक राहते आणि आयुष्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते अशी मान्यता आहे.
राजसिक पदार्थांमध्ये मीठ, मिरची, मसाले, अंडी, मासे, केशर या पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांचे सेवन केल्यास मन चंचल होते आणि जिवणात स्थिरता रहात नाही.
लसूण आणि कांदा हे पदार्थ तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात. या पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये राग, अहंकार, उत्तेजितपणा जास्त प्रमाणात दिसून येतो.
या धार्मिक कारणांमुळे कांदा आणि लसून या दोन्ही पदार्थं कोणत्याही समाला किंवा उपासाच्या दिवशी खाऊ नये.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.