Do Not Drink Water After Eating These Fruits : 'ही' फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका, नाहीतर होतील 'या' गंभीर समस्या

Do Not Drink Water : बहुतेक लोक जेवन झाल्ल्यानंतर पाणी पितात. पण अन्न खाल्ल्यानंतर ही सवय नीट जात नाही.
Do Not Drink Water After Eating These Fruits
Do Not Drink Water After Eating These FruitsSaam Tv

Fruits : बहुतेक लोक जेवन झाल्ल्यानंतर पाणी पितात. पण अन्न खाल्ल्यानंतर ही सवय नीट जात नाही. दुसरीकडे काही लोक फळं खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का की असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. होय, अशी काही फळे आहेत जी खाल्ल्यानंतर पिऊ नयेत. चला, आज आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की कोणती फळे खाल्ल्यानंतर पिऊ नये.

फळे खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

फळांमध्ये जबरदस्त हायड्रेटिंग पॉवर असते जी आपली तहान शांत करण्यासाठी पुरेशी ठरते. पण फळांचे सेवन केल्यानंतर जर तुम्हाला तहान लागली असेल तर किमान 30 मिनिटे थांबाणे हे योग्य ठरू शकते.

बहुतांश डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ फळ आणि पाणी दरम्यान 40 ते 50 मिनिटांचे अंतर राखण्याचा सल्ला देतात. पण जर तुम्हाला फळे खाल्ल्यानंतर जास्तच तहान लागली असेल तर 30 मिनिटांनंतर आपण फक्त एक किंवा दोन घोटच पाणी (Water) पिऊ शकता. पण एक तास पूर्ण झाल्यानंतर मात्र तुम्ही संपूर्ण ग्लास पाणी पिऊ शकता.

Do Not Drink Water After Eating These Fruits
Fruit and Mint Custard Recipe : जेवणानंतर काही गोड खायच आहे? तर फ्रूट अँड मिंट कस्टर्ड बनवून पाहा, जाणून घ्या रेसिपी

असंतुलित होते PH लेवल -

फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे आपल्या पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच लेवन बिघडते. पोटाची (Stomach) सामान्य पीएच पातळी आम्लीय म्हणजेच अॅसिडीक असते, जी 1.5 ते 3.5 दरम्यान असते. पण जर तुम्ही फळे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायले तर पाचन तंत्राची सामान्य आम्ल पातळी पाण्याने भरली जाऊन कमी होते.

ही फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका -

फणस -

फणस खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. त्यामुळे डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात. जॅकफ्रूट खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटाच्या पीएचवर परिणाम होतो आणि पचन मंद होते कारण पाणी पाचक ऍसिड आणि एन्झाइमची क्रिया पातळ करते.

पेरू-

बहुतेक लोक पेरू खाल्ल्यानंतर पाणी पितात. पण पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका कारण असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. म्हणूनच पेरू खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.

केळी -

केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. कारण पचनाच्या समस्या असू शकतात, त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये.

Do Not Drink Water After Eating These Fruits
Timing Of Fruit Juice : फळांचा रस सेवन करण्याची योग्य वेळ नेमकी कोणती, जाणून घ्या लक्षणे

नाशपाती -

नाशपातीचे सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. कारण असे केल्याने तुम्हाला सर्दी आणि खोकल्याची समस्या होऊ शकते. म्हणूनच नाशपाती खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.

सफरचंद -

सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण जर तुम्ही ते खाल्ल्यानंतर पाणी प्याल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका.

डाळिंब -

डाळिंबात भरपूर पोषक असतात. त्याचबरोबर त्यात लोह आणि असे अनेक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण अनाप खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com