ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्याचा स्वभाव आणि भविष्य वेगळे असते. एखाद्या व्यक्तींच्या नावावरुन त्याची ओळख ठरते. तुमच्या नावाच्या सुरुवातीचे पहिले अक्षर हे तुमच्या स्वभावाचा आरसा असतो. यावरुन त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व कळते.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीची जन्मतारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ ही राशीवरुन ठेवली जाते. राशीच्या आधारावर व्यक्तीचे नाव ठेवले जाते. ग्रहांच्या प्रभावाच्या आधारावर नाव निवडले जाते. यासाठी नावाचे पहिले अक्षर देखील महत्त्वाचे मानले जाते. या ३ अक्षरांच्या नावाचे लोक अधिक भाग्यवान असतात. करिअरमध्ये त्यांना यश मिळते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जर तुमचे नाव D, B आणि N या अक्षरांनी सुरु होणार असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार या अक्षराने सुरु होणाऱ्या नावाच्या लोकांचे भाग्य खूप चांगले असते. तुमचं नावही या अक्षराने सुरु होत असेल तर जाणून घेऊया त्याबद्दल
1. D अक्षराने सुरु होणारी नावे
D या अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक खूप भाग्यवान असतात. ही लोक मनाने अतिशय चांगले असतात. यांना तोंडावर बोलण्याची सवय असते. परंतु, यांच्या मनात कोणतीही गोष्ट नसते. अशा लोकांना आयुष्यात आर्थिक (Money) तंगीचा सामना देखील करावा लागत नाही. मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात.
2. B अक्षराने सुरु होणारी नावे
ज्या लोकांचे नाव B अक्षराने सुरु होते त्यांचे आयुष्य खूप आनंदी असते. मेहनतीच्या जोरावर सर्व काम करु शकतात. पैशांच्या बाबतीतही खूप भाग्यवान आहेत. यामुळे ते आनंदात जीवन जगतात.
3. N अक्षराने सुरु होणारी नावे
ज्या लोकांचे नाव N अक्षराने सुरु होते त्यांना नाचण्यात आणि गाण्यात अधिक रस असतो. यांना संगीत क्षेत्र अधिक आवडते. यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते. हे लोक कुटुंबातील सदस्यांचे आवडते असतात. याचे जीवनही खूप स्थिर असते. यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.