गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील पठारभागात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस पडत आहे.
जिल्ह्यात शनिवारी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने रब्बी पिकाचं मोठं नुकसान केलं असल्याची चित्र दिसत आहेत.
जिल्ह्यातील डोळासणे, कर्जुले, पिंपळगाव देपा, सारोळे पठार गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले.
गारपीटीनंतर रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
महाराष्ट्रात आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.