प्लास्टिकच्या भांड्यात गरमागरम जेवण ठेवल्यास प्लास्टिक वितळण्याची शक्यता असते. यामुळे भांडी लवकर खराब तर होतात पण सर्वात महत्वाचे आपले आरोग्य धोक्यात येते.
प्लास्टिक दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी बीपीए नावाचे रसायन वापरले जाते. आपण प्लास्टिकच्या भांड्यातून जेवण केल्यास हे रसायन आपल्या पोटात जाते. ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होतात.
दीर्घकाळ प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जेवण ठेवल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
बीपीए रसायन मानवी शरीरात गेल्यास हार्मोन असंतुलित होतात.
हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे मूड स्विंग होतात. ताण, चिडचिडेपणा वाढतो.
शरीरात संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो.
प्लास्टिकच्या भांड्यातून खाल्ल्याने हृदयविकार, कर्करोगाचा धोका आणि रक्तवाहिन्याच्या समस्या निमार्ण होतात.
प्लास्टिकच्या भांड्यात नेहमी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न ठेवल्यामुळे अन्नामध्ये बीपीए पातळी वाढते. जे आरोग्यास हानीकारक आहे.
प्लास्टिकच्या भांड्यातून अन्न खाल्ल्याने वजन वाढू लागले होते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.