नवरा-बायकोचं नातं हे विश्वास आणि एकमेकांच्या प्रेमाने फुलत असते. जोडीदाराची एक चूक नात्यात कटूता आणू शकते.
चाणक्य नीतीनुसार नवरा बायकोने चुकूनही 'या' गोष्टी एकत्र करू नका. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होताना दिसून येतात.
नवरा बायकोने कधीही एकत्र ध्यान किंवा योगा करू नये. यामुळे लक्ष विचलित होऊन आपण ध्येयापासून दूर जातो.
नवऱ्यासोबत बसून बायकोने कधीच काम करू नये त्यामुळे कामांमध्ये समस्या वाढतात लक्ष विचलित होते. कामामध्ये नवरा बायको एकट्याने जास्त प्रगती करू शकता.
पती-पत्नीने संवाद कधीच थांबवू नये. कितीही भांडणे झाली तरी एकमेकांशी बोलत राहणे खूप गरजेचे असते. यामुळे नात्यांमध्ये विश्वास वाढतो. मात्र काही गुपित आपल्या जोडीदाराला न सांगणे उत्तम ठरते. यामुळे संसार सुखाचा होतो.
नवरा बायकोने कधीही एकमेकांचा बाहेरच्या परक्या व्यक्तीसमोर अनादर करू नये. त्यांचा आदर बाळगून बोलावे. इतरांसमोर एकमेकांचा अनादर केल्यामुळे स्पर्धेची भावना निर्माण होते. ज्यामुळे नाते कमकुवत होण्यास सुरुवात होते.
पती-पत्नीने एकमेकांसोबत चुकूनही खोटे बोलू नये. खोटे बोलल्यामुळे नात्यातील विश्वास कमी होत जातो. कालांतराने नाते तुटू लागते. नात्यात पारदर्शकता खूप महत्त्वाची असते.
नवरा-बायकोने कधीही त्यांच्या पूर्व आयुष्याच्या रिलेशनशिपबद्दल वारंवार एकमेकांशी बोलू नये. कारण याचा कळत नकळत जोडीदाराच्या मनावर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे नात्यावर वाईट परिणाम होता.
नवरा बायकोने कधीही एकमेकांशी स्पर्धा करू नये. ही स्पर्धा त्यांच्या नात्याची नीव कमकुवत करते. एकमेकांचे जोडीदार हळूहळू प्रतिस्पर्धक बनू लागतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.