अनेक लोकांना त्याच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात मिठ खाण्याची सवय असते. परंतु यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते.
तुम्हाला जर रक्तदाब, मधुमेह सारख्या समस्या असल्यास तज्ञ मिठाचा आहारात कमी वापर करण्याचा सल्ला देतात. जास्त प्रमाणात मीठ खाण्याचे दुष्परिणाम चला जाणून घेऊया.
मीठामध्ये ४०% सोडीयम असतं. मिठाच्या सेवनामुळे शरीराला पुरेसे सोडियम मिळते. शरीरात सोडीयमची आवशक्ता असतेच मात्र जास्त प्रमाण झाल्यास तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.
जेवणात जास्त मिठ झाल्यास पदार्थाची चव बिघडते आणि त्यासोबतच शरीराला दुष्परिणाम होण्याची शक्यता देखील वाढते. तज्ञांनुसार जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.
जास्त प्रमाणात मीठ खाल्यामुळे हृदयासंबंधीत समस्या होऊ शकतात. त्यासोबतच रक्तादाबाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्ययामुळे जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करणं टाळा.
दिवसभरात पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठाचे सेवन करा. 2 ते 3 वर्षांच्या लहान मुलांना कमी प्रमाणात मीठ द्या यामुळे त्यांच्या शरीर निरोगी राहाते आणि त्याचे आरोग्य देखील सुधारते.
बाहेरून आणत असलेल्या चमचमीत पदार्थामध्ये मीठाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. चिप्स, कुरकुरे अशा पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं म्हणून या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात आयोडिन युक्त मीठाचा समावेश केला पाहिजेल ज्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहाते आणि बाळाची वाढ होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.