हिवाळ्यात अनेक जणांना गरम पाणी की थंड पाणी प्यावे काही समजत नाही. बहुतेक लोक थंड पाणी पिण्याचे टाळतात तर काही अति गरम पाणी पितात. जाणून घ्या हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे पाणी प्यावे.
तज्ज्ञांचे मते, हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. मात्र ते बर्फासारखे अति थंड पाणी नसावे.
हिवाळ्यात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे लोकांना सर्दी, खोकला आणि फ्लूचा त्रास होतो.
हिवाळ्यात सर्दी, खोकल्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी पिणे टाळावे. यामुळे तुम्ही जास्त आजारी पडू शकता.
हिवाळा असल्यामुळे लोक पाणी कमी पितात जे चुकीचे आहे. शरीर हायड्रेट राहण्यासाठी हिवाळ्यातही थंड पाणी पिणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात गरम पाणी नाही तर कोमट पाणी प्यावे. जास्त गरम पाण्यामुळे आतड्यांना इजा होते.
तज्ज्ञांचे मते, हिवाळ्यात खबरदारी म्हणून तुम्ही कोमट पाणी प्यावे. ते सर्वात बेस्ट राहते.
हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर जातात.
जास्त गरम पाणी प्यायल्याने तहान कमी लागते आणि शरीरात डिहायड्रेट होते. जे आरोग्यासाठी चुकीचे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.