यवतमाळमध्ये दूषित पाण्यानं असोला गावातील तब्बल 14 जणांचा जीव गेलाय. दूषित पाण्यातमुळे किडनीच्या आजारानं या गावातील अनेकजण त्रस्त झालेत. गावातील जलस्त्रोतांचे नमुने तपासण्यात आले. त्यावेळी पाण्यात फ्लोराईड आणि नाईट्रेडचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलंय. गावातील १८० जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आलंय. तब्बल ८० व्यक्तींच्या रक्तात क्रिटीनायिन चे प्रमाण १.४ असायला हवे येथे हे प्रमाण वाढून ५.४ इतक्या उच्चाका पर्यंत पोहचले आहे. यापूर्वी १४ जणांचा बळी गेला असून २० व्यक्ती आजारी आहेत. ज्या गावात हा सगळा प्रकार घडलाय, तिथून आरोग्य केंद्र लांब असल्यानं गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.