...म्हणून मराठा समाजाचा उद्रेक झाला आणि ते आक्रमक झाले - शरद पवार 

...म्हणून मराठा समाजाचा उद्रेक झाला आणि ते आक्रमक झाले - शरद पवार 
Published On

मराठा समाजातील तरूणांनी आजवर शांततेच्या मार्गानं आपल्या मागण्या मांडल्या. या समाजानं कायदा आणि सुव्यस्थेला धक्का लागू दिला नाही, असं असतानाही मुख्यमंत्री आणि इतर मंत्री चिथवणीखोर विधानं करत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला सुनावलंय.

लेखी निवेदनाद्वारे त्यांनी सरकारवर टीका केलीय. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी विषयाचं गांभीर्य ओळखून या आंदोलनातील घटकांसोबत त्वरित संवाद साधावा. जेणेकरून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टळून सर्वसामान्यांना याची झळ बसणार नाही. असंही शरद पवारांनी आपल्या निवेदनात म्हंटलंय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com