महायुतीवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
निवडणुकीआधी पैशांची उधळण होतेय.
या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडालीय.
निवडणुकांच्या तोंडावर पैशाची उधळण होतेय, हा सत्तेचा माज आहे. भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय अशी टीका ठाकरे गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. “मतांचा लिलाव सुरू आहे का?” असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. निवडणुकीत पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत. “हा पैसा येतो कुठून? याचे उत्तर कोणाकडेच नाहीये.
“एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या राज्यकर्त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे. मुंबईमध्ये गेले दोन-तीन वर्षे प्रदूषण असह्य झालंय. शहराच्या हवेत माणसाच्या आरोग्याला घातक अशी परिस्थिती निर्माण झालीय. यावरूनही त्यांनी सरकरावर निशाणा साधला. हे प्रदूषण फक्त धूळ-धूराचं नसून, “हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे, त्यातून उठलेले भ्रष्टाचाराचे ढग संपूर्ण महाराष्ट्रावर घोंगावत आहेत,” असा आरोपही ठाकरेंनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.