टीएआयटी परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. मात्र, यामध्ये बी.एड.तसेच डी.एड.च्या 6 हजार 319 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परीषदेच्या आयुक्त यांनी दिली आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल आज लागणार आहे.
शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षेमध्ये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता,त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते.
परीक्षेस एकूण 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेला एकूण 2 लाख 11 हजार 308 प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी बी.एड्. परीक्षेचे 15 हजार 756 आणि डी.एल.एड. परीक्षेचे 1 हजार 342 असे एकूण 17 हजार 98 उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.