१५ ऑगस्ट रोजी मांसाहार बंदीमुळे महाराष्ट्रात राजकीय ताप निर्माण झाला आहे.
संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा मांसाहाराचा उल्लेख करत सरकारवर टीका केली.
बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत होते आणि युद्धासाठी मांसाहार आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
संजय राऊत यांनी सर्व मराठी माणसांना या बंदीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
15 ऑगस्ट रोजी मांसाहार बंदी निर्णयानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन मावळे लढत होते, का ते मांसाहार करत होते बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत होते. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचा सैन्याला सुद्धा मांसाहार करावा लागतो. श्रीखंड पुरी खाऊन नाही लढता येत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करत आहात ना मर्द करत आहात देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या
स्वातंत्र्यदिनी मांसाहारात नाही तुम्ही नका खाऊ तुम्ही सगळे लपवून खात आहात, मग लोकांवरती हे बंदी का प्रत्येक प्रकारची बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हा हे बोलू नका ते बोलू नका महाराष्ट्र आहे की बंदी शाळा आहे या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल असे संजय राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.