विधानपरिषदेतील पराभवानंतर शेकापचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिय समोर आली आहे. निवडणुकीमध्ये पहिल्यांदा घोडाबाजार झाला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामूळे आम्ही आत्मचिंतन करू, महाराष्ट्र राजकारणामध्ये मध्ये असे राजकारण कधी झाले नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. मी राष्ट्रवादीच्या बारा मतांवर उभा होतो त्यात 1 मत फुटलं, पण अजून काही मत मिळाली असती तर मी 2 च्या फरकाने निवडून आलो असतो असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आमची भूमिका ठाम आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार माझ्या साठी उभे राहिले म्हणत पाटलांनी त्यांचे आभार मानले आहेत
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.