मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे भाजपने आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षांची तीन तीन नावं निश्चित करून तयारीला वेग दिला आहे. 'निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे, हे सत्ताधार्यांच्या हातचं बाहूलं आहे,' असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. मतदार यादीतील घोळ आणि दुबार नावांवरून निवडणूक आयोगाला पत्रकार परिषदेत समाधानकारक उत्तरं देता न आल्याने त्यांनी हा संताप व्यक्त केला. याचबरोबर, राज्य निवडणूक आयोगाने 'अ' वर्ग नगरपरिषद अध्यक्षपदासाठी १५ लाख तर 'ब' वर्गासाठी ११ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा वाढवून दिली आहे, ज्यामुळे निवडणुकीतील खर्चाचा आकडा वाढणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.