मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यात मतदानाचा हक्क बजावला. यांना असे पाडा की यांच्या पाच पिढ्या उभ्या नाही राहिल्या पाहिजे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. जरांगे पाटील म्हणाले की मतदान करताना आपली लेकरं डोळ्यांसमोर ठेवा, सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीचा बाजूने मतदान करा, ६ जून पर्यंत सरकारने आरक्षण दिलं नाही तर आरक्षण देणारे व्हा असेही जरांगे पाटील म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर आणि छत्रपतींचे दोन्ही गादींचे वंशज यांचा सन्मान करावा असेही जरांगे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.