मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारकडून हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आला. हा जीआर मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देण्यात आला. जीआर मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. सरकारने काढलेल्या जीआरची प्रत घेऊन मराठा उपसमितीचे सदस्य जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे जीआर सोपवण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काढलेला जीआर स्वीकारला. जीआर मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारचे आभार मानले. यावेळी त्यांनी सांगितले की, विखे-पाटील, सामंत, सरनाईकसाहेब हे सर्वजण इथे आले आहेत. माझी एक इच्छा आहे या सर्व कामाचे श्रेय विखे-पाटील यांना जातेच पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडायला यावे. तुमचं आणि आमचं वैर संपलं.' तसंच, 'मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण आहे.', असे मनोज जरांगे यांनी सांगितले. 'चांगल्या कामासाठी आमच्या घरी स्वागत राहिल.', असे विखे पाटील यांनी जरांगेना सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.