पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळीबार करत 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यानंतर भारताने सिंदूर ऑपरेशन राबवत शंभरहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. गनिमी कावा करत भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या आहेत. पाकिस्तानचं एअरबेस उद्ध्वस्त करण्याआधी भारतीय हवाई दलाने एक बनावट लढाऊ विमान पाकिस्तानच्या दिशेनं पाठवलं आणि पाकड्यांचा काटा काढला.
तोतया विमान पाहून पाकिस्तानचं लक्ष विचलित झाल्यानंतर भारताने ब्राह्मोस मिसाईलचा जोरदार मारा केला. एका पाठोपाठ एक असे तब्बल 15 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागले आणि पाकिस्तानचं एअरबेस उद्ध्वस्त केलं.
पाकिस्तानला ज्या AWACS विमानाचा अभिमान आहे ते भारताच्या ब्रह्मोस मिसाइलने नेस्तनाबून केले. पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी शक्तिशाली AWACS विमानाचा नाश केल्याची कबुली दिली आहे. AWACS हे एक पाळत ठेवणारे विमान आहे, ज्याला 'स्काय आय' असंही म्हणतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.