बच्चू कडू यांनी मराठा ओबीसी आरक्षण वादावर मोठं वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी एकत्र येऊन दिल्ली समोर लढा उभा केला पाहिजे असं आव्हान बच्चू कडू यांनी केलं आहे. मराठा, ओबीसी वाद शांत झाला पाहिजे असं देखील ते म्हणाले. छगन भुजबळांनी ओबीसी मधील 10 ते 15 टक्के आरक्षण कसे वाढविता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. मराठवाडयातील मराठा हा कुणबी असून जरांगेंची मागणी रास्त आहे असं म्हणत भुजबळ आणि जरांगे यांना एकत्र येण्याच आव्हान बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच जर सगळे मराठे ओबीसी मध्ये आले तर अडचण निर्माण होणार असून त्यावर तोडगा काढण्यासाठी 'मी' जरांगे पाटील व छगन भुजबळ यांना उद्या किंवा परवा भेटणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.