सुगरण

भाजपच्या किती प्रभावाखाली राहायचं हे शिवसेनेनं ठरवावं  : बाळासाहेब थोरात

सकाळ न्यूज नेटवर्क

संगमनेर : आता शिवसेनेने ठरवायचे आहे की, त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, कॉग्रेसकडे प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ, असे महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष  वेगळ्या फाॅमुर्ल्यास तयार झाल्यास राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे थोरातांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निर्माण झाली आहेत. सत्ता स्थापन करण्याची काहीही घाई नाही, योग्य वेळी निर्णय घेण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी वेगळीच आघाडी निर्माण होण्याबाबतही सध्या चर्चा हाेत आहे. याबाबत संगमनेरमध्ये आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी घेऊ, मात्र त्याआधी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. भाजपाला घाबरायचे अथवा नाही हे आता सर्वस्वी शिवसेनेने ठरवावे. शिवसेनेचा निर्णय झाल्यास आम्ही आमच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची परवानगी घेऊ अशीही भूमिका थोरात यांनी मांडली.

दरम्यान, अनेक मोठमोठे नेते पक्ष सोडून जात असताना आपल्यावर तीन महिन्यांपूर्वी राज्याची जबाबदारी काँग्रेसने टाकली, आपण ती पुरेपूर निभावण्याचा प्रयत्न केला. संगमनेर मतदारसंघाला वेळ देता आला नाही. मात्र आपली निवडणूक कार्यकर्ते आणि जनतेनेच लढवली. त्यामुळे हा संगमनेरच्या जनतेचा विजय असल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: balasaheb thorat hint to support shiv sena maharashtra election result 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT