IND vs SA:  Twitter
Sports

IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द, आता दुसरा सामना कधी?

India vs South Africa 1st T20I : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

India vs South Africa 1st T20I :

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे न बॅटिंग, न बॉलिंग करता सामन्याचा निकाल जाहीर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे-सातच्या सुमारास सुरु होणार होता. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. आता या टी-२० मालिकेचा दुसरा सामना १२ डिसेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

पाऊस आल्याने सामन्याचा टॉसही झाला नाही. तीन सामन्यांची टी-२० मालिकेत आता पुढील दोन सामने निर्णायक ठरणार आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे. आता पुढील दोन १२ डिसेंबर आणि १४ डिसेंबर रोजी होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या टी-२० सामन्यात पावसाने बाजी मारली आहे. या पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर होत होता. पावसामुळे सामन्याचे षटकही कमी करण्याचे ठरविले होते. मात्र, पाऊस सुरुच राहिल्याने भारतीय वेळेनुसार रात्री ९.२५ वाजता सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.

वर्ल्डकपआधी टीम इंडिया किती सामने खेळणार?

तत्पूर्वी, ३ जून ते ३० जून, २०२४ दरम्यान होणारा टी-२० वर्ल्डकप हा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. त्यात आजचा सामना रद्द झाल्याने आता टीम इंडिया फक्त ५ टी-२० सामना खेळणार आहे. तर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरोधात फक्त २ टी-२० सामने खेळणार आहेत.

या दौऱ्यानंतर भारतात अफिगाणिस्तविरुद्ध तीन सामन्यांची मालिका असणार आहे. या मालिकेनंतर संघ वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर टीम इंडियाने २००७ साली पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT