मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कमबॅक केलं.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवून मालिकेवर ३-१ कब्जा केला. दरम्यान शेवटचा सामना जिंकून भारतीय संघ ४-१ ने ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे पाचव्या सामन्यातही प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी द्यावी? या प्रश्नामुळे सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांची डोकेदुखी वाढणार यात काहीच शंका नाही.
या सामन्यात मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. यापूर्वी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली होती. मात्र त्याला ३ षटकात एकही गडी बाद करता आला नव्हता.
भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी केली आहे. त्याला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. कारण भारतीय संघाला ही मालिका झाल्यानंतर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका आणि दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळायची आहे. त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते. तर हर्षित राणाचाही प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, हर्षित राणा, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.