भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामना २६५-२६५ धावांवर बरोबरीत सुटला.
सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून लागला.
सुपर ओव्हरनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी आक्रमक जल्लोष केल्याचा आरोप.
श्रीलंकेत भारत 'अ', श्रीलंका 'अ' आणि अफगाणिस्तान 'अ' यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. सोमवारी १५ जून रोजी भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यात सामना झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या. वरच्या फळीतील एकाही फलंदाजाला विशेष खेळी करता आली नाही. वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा यांसारखे खेळाडू अपयशी ठरले.
अखेरीस या सामन्याचा निकाल 'सुपर ओव्हर'द्वारे लागला. मात्र या सुपर ओव्हरनंतर श्रीलंका आणि भारतीय खेळाडूमध्ये जोरदार राडा झाला. विजयाचे जल्लोष करताना श्रीलंकेच्या खेळाडूंनी आक्रस्ताळेपणा करत मैदानात राडा घातला. लंकेच्या खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीला धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सलामीवीर प्रभसिमरन सिंगने १३ चेंडूंत ११ धावा केल्या, तर त्याच्यासोबत फलंदाजीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूंत २१ धावा केल्या. याव्यतिरिक्त, ऋतुराज गायकवाडने ४२ चेंडूंत ३७ धावा केल्या. कर्णधार तिलक वर्माने ३२ चेंडूंत २३ धावा केल्या आणि आयुष बदोनीला ३५ चेंडूंत १५ धावा करता आल्या. निशांत सिंधूलाही विशेष खेळी करता आली नाही. तो १२ चेंडूंत ६ धावा करून बाद झाला.