बातमी मागची बातमी

VIDEO | कोरोनाच्या भीतीनं एकच विद्यार्थी शाळेत आला आणि मग पुढे काय झालं? तुम्हीच पाहा

साम टीव्ही

तब्बल 8 महिन्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात शाळा उघडल्या. मात्र कोरोनाबाबत  पालकांच्या मनात अद्यापही भीती आहे. शाळा सुरु झाल्या पण शाळेत विद्यार्थी आले नाहीत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेत तर एकच विद्यार्थी उपस्थित होता.

परीक्षा झाल्या नाहीत. परीक्षा न होता पोरं पास झाली. उन्हाळ्याची सुट्टी लॉकडाऊनमधी गेली. पावसाळा अख्खा पोरांनी घरात घालवला. शेवटी दिवाळीची सुट्टी पण त्या लॉकडाऊनमधी मोडली. घरी बसलेल्या पोरांच्या कानावर शेवटी ही आवाज ला.(घंटेचा आवाज शाळेच्या). 

शाळात पोरं येणार म्हणून शिपाई मामाबी कामाला लागलं. शाळात परत किलबिलाट होईल म्हणून शिपाई मामांनी पोरांच्या सुरक्षेची खबरदारी घेत सगळी बाकं सॅनिटाझरनं पुसून घेईतली. अख्खा वर्ग  सॅनिटाझ केला.  

अन् अखेर पहिला पट्टा रिक्षातनं उतरला. तोंडावर मास्क सुरक्षित अंतर ठेवून गडी शाळंकडं निघाला एकटाच. गड्याला चुकल्यावानी वाटत असलं पण शाळाच्या गेटवर हातावर सॅनिटाझर देऊन स्वागत केलं अन् टेम्परेचर बी तपासलं. शाळात सगळ्या विषयाचं शिक्षक हजर होतं. पण विद्यार्थी मात्र एक वगळता गैरहजर.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकार आन् प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेतंय. पहिल्या दिवसापासून सूचना करतंय. पालक अन् विद्यार्थीपण सूचनांचं पालन करतायत. खरबदारी म्हणून पालकांनी मुलांना शाळत पाठवायचं नाय ठरवलं. खरतंर अंतिम निर्णय हा पालकांचा. पण खात्रीनं सांगतो. एक दिवस हिच शाळा पुन्हा भरणार 100 टक्के हजेरी सह अन् तेव्हा कोरोना संपला असंल 
 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT