drowned  saam tv
देश विदेश

Jharkhand News : सहा मित्रांचा धरणात बुडून मृत्यू, कॉलेजला दांडी मारुन गेले होते फिरायला

Drown News : सर्वजण १२ वीच्या वर्गात शिकत होते. शाळा बंक करुन हे सर्व मित्र पिकनिकला गेले होते.

प्रविण वाकचौरे

Jharkhand News :

पिकनिकला गेलेल्या ६ मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. झारखंडच्या हजारीबाग जिह्यातील लोटवा धरणात मंगळवारी ही घटना घडली आहे. सर्वजण १२ वीच्या वर्गात शिकत होते. शाळा बंक करुन हे सर्व मित्र फिरायला गेले होते.

रजनीश पांडे, सुमित कुमार, मयंक सिंग, प्रवीण गोप, इशान सिंग आणि शिवसागर सिंग अशी मृतांची नावे आहेत. सर्वांचे वय १७ ते १८ वर्ष असल्याची माहिती मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणावर फिरायलेल्या गेलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. सर्वात आधी दोन विद्यार्थी धरणात उतरले आणि थोड्याच वेळात बुडू लागले. हे पाहून इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी धरणात उड्या मारल्या. मात्र काही मिनिटातच सहा मित्र धरणात बुडाले, तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या दाव्यानुसार, विद्यार्थी मंगळवारी सकाळी गणवेशात घरातून बाहेर पडले. परंतु वर्गात न जाता सर्वजण धरणावर फिरायला गेले. त्या दिवशी वर्गात जवळापास १६-१७ जण अनुपस्थित होते. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हजारीबाग जिल्ह्यातील लोटवा धरणात सहा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दु:खद बातमीने मन दुखावले आहे.दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

SCROLL FOR NEXT