marriage (representative photo) saam tv news
देश विदेश

ऑंsss काय सांंगता! नवरदेव स्वतःच्या लग्नाला जायलाच विसरला; दुसऱ्या दिवशी नवरीकडे गेला, तिथं जे झालं...

Viral News : बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bihar News: लग्न म्हटलं की तयारी आणि इतर लगबग त्यामुळे झोप येत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र एक नवरदेव लग्नाच्या आदल्या दिवशी दारु पिऊन असा गाठ झोपला की तो लग्नाला जायलाच विसरुन गेला. बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडली आहे.

नवरदेव नशा उतरल्यावर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सासरवाडीला पोहोचला. त्याला पाहताच मुलीकडच्या मंडळींचा राग अनावर झाला आणि थोडा गोंधळ निर्माण झाला. यानंतर मुलाने मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला, मात्र तिने नकार दिला. (Latest News)

यानंतर मुलाकडच्यांनी लग्नाचा आग्रह धरला. मुलीकडील गावकऱ्यांनी नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना डांबून ठेवलं. लग्नाच्या तयारीसाठी झालेला खर्च देण्याची मागणी त्यांनी केली. मुलीकडच्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून मुलाच्या कुटुंबीयांनी पैसे देणे मान्य केलं आणि तिथून सुटका करुन घेतली.

लग्नाच्या दिवशी नवरदेव दारूच्या नशेत आढळल्याने माझ्या कुटुंबीयांची समाजात बदनामी झाली आहे. मुलगा आधीच दारूच्या आहारी गेला असेल तर पुढे काय होईल माहीत नाही. मी समाजातील सर्व मुलींना आवाहन करते की, अशा दारुड्या मुलाशी अजिबात लग्न करू नका, असं मुलीने म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT