संतोष शालीग्राम
नवी दिल्ली - राजधानीत वाढतं वायू प्रदूषण अतिशय गंभीर होत चालली आहे. वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढायलामुळे दिवसेंदिवस दिल्लीची हवा विषारी होत चालली आहे. दिल्ली सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची तयारी आहे. दिल्ली सरकारने 26 पानी प्रतिज्ञापत्रात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या १३ नोव्हेंबरच्या आदेशानंतर सरकारने आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यासह आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली आहे. सरकारने कॅनॉट प्लेस परिसरात हवा स्वच्छ करण्यासाठी आधुनिक प्लँट उभारण्याची माहिती दिली असून पर्यावरण रक्षणाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी माहितीही दिली आहे.
शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रदूषणाची स्थिती गंभीर असल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. येत्या दोन-तीन दिवसांत प्रदूषण कमी होईल, अशा उपाययोजना कराव्यात, असे न्यायालयाने सांगितले होते.
हे देखील पहा -
दिल्ली सरकारने म्हटले आहे की न्यायालयाच्या आदेशावर तात्काळ केलेल्या उपाययोजनांमुळे प्रदूषण कमी झाले आहे आणि पुढील दोन-तीन दिवसांत ते आणखी कमी होईल असा अंदाज आहे. राजधानीतील ७४ टक्के प्रदूषण हे औद्योगिक घटक, वाहने आणि धुळीमुळे होत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.