atal Bihari Vajpayee
atal Bihari Vajpayee  Saamtv
देश विदेश

Atal Bihari Vajpayee: 'तुम्ही तर पाकिस्तानमध्येही...' थेट नवाझ शरिफांनी केले होते कौतुक; अटल बिहारी वाजपेयींचा गाजलेला किस्सा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: भारताचे माजी पंतप्रधान , एक आदर्श, लोकप्रिय नेते आणि प्रसिद्ध कवी म्हणून अटबिहारी वाजपेयी यांचे नाव आजही घेतले जाते. भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दिची नोंद घेतली जाते. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. आज (25, डिसेंबर) अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. जाणून घेवूया त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्सा जेव्हा खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले होते.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. ज्यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान संबंध सुधरण्यासाठी दिल्ली ते लाहोर अशी बससेवाही सूरू केली. 19 फेब्रूवारी 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात ही बससेवा सुरू झाली यावेळी ते पाकिस्तान दौऱ्यावरही गेले होते.

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही यावेळी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत या पाकिस्तान दौऱ्यावर 22 सदस्य होते. ज्यामध्ये पत्रकार कुलदीप नैयर, अभिनेते देव आनंद अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

यावेळी सर्वात चर्चा झाली ती पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाची. या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे लाहोर किल्ल्यावर स्वागत करण्यात आले. यावेळच्या भाषणात त्यांनी अब जंग ना होने देंगे हम ही कविता सादर केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या या भाषणाने आणि कवितेने पाकिस्तानची जनता तर थक्क झालीच त्याचबरोबर पंतप्रधानही भारावून गेले.

अटलबिहारी वाजपेयी यांची अस्सल संस्कृत भाषा, मधुर वाणी आणि प्रभावी भाषणाने नवाझ शरिफही थक्क झाले. यावेळच्या भाषणात त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे तोंडभरुन कौतुक केले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचे कौतुक करताना तुम्ही आता पाकिस्तानमध्येही निवडणुक लढवून विजयी होऊ शकता अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचं निधन झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Srikanth Film : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला, राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक

Maharashtra Unseasonal Rain: नाशिकसह अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; फळबागांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात

Mother's Day 2024 : 'मदर्स डे'ला स्पेशल बनवायचंय? मुंबईतील 'या' नयनरम्य ठिकाणी आईला नक्की घेऊन जा

Mothers Day 2024: मदर्स डे'च्या दिवशी पाठवा खास शुभेच्छा

Petrol Diesl Rate (12th May 2024): मुंबई आणि पुण्यासह मेगा सिटीमध्ये पेट्रोल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

SCROLL FOR NEXT