Rain Saam tv
मुंबई/पुणे

Rain Alert: मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार; १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. कोकणासह विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे, आता पुढील दोन दिवसही मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे.

पुढील दोन दिवस मुंबईत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी मुंबईत 'रेड' अलर्ट जारी होता, पण फक्त २.२ मिमी पाऊस झाला. मात्र, पाऊस सुरूच होता. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या या गावांमध्ये पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका लोकांना बसला आहे.

पूरग्रस्त गावांमधून जवळपास २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गडचिरोली, हिंगोली आणि नांदेड हे तीन जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसानंतर या ठिकाणी सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी असलेल्या दिवसांमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना प्रवेश करण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला होता.

ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा विशेष आदेश मुंबईत १२ जुलैपर्यंत लागू आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त, मान्सूनचा परिणाम दक्षिणेकडील तेलंगणा राज्यावर झाला आहे. येथे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस १२ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT