पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी त्यांनी पुरंदर तालुक्यातील पारगावसह सात गावांतील जमीन विमानतळासाठी देण्यास विरोध व्यक्त केला आहे. पुणे विमानतळासंदर्भात राज्य सरकारने अधिसुचना काढल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. हे आंदोलन सुरू असून, अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अधिसूचना काढली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा पूर्वीपासून या विमानतळाला विरोध आहे. शेतकऱ्यांचा म्हणणं आहे की, त्यांना त्यांच्या शेतीच्या जमिनीचे समर्पण करणे परवडत नाही, कारण यामुळे त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत नष्ट होईल. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत उपोषण आणि मोर्चासारखे विविध मार्ग वापरून आपला विरोध दर्शवला आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही केलं होतं उपोषण
पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ७ गावातील नागरिकांनी सासवडमधील प्रशासकीय इमारतीसमोर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन केलं होतं. शेतकरीवर्ग मोठ्या संख्येनं बेमुदत उपोषणाला बसलेले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यांनी हे उपोषण मागे घेतलं. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होवू न देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. तसेच या प्रकल्पाला कायम विरोध ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू
सरकारकडून पुरंदर परिसरातील जमिनीवर ड्रोन सर्व्हे सुरू होता. सरकार आपली जमिन काढून घेणार, ही भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली. याच भीतीपोटी एका शेतकऱ्याने आपले प्राण सोडले होते. यानंतर पारगाव ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.