Dilip Walse Patil Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राऊत,राणे अन् फडणवीस रोज एकमेकांची अब्रू काढतात; यातून सामान्यांचे हिताचे काय? वळसेपाटलांचा सवाल

Dilip Walse Patil News: वळसेपाटील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील दौऱ्यावर असताना बोलत होते.

रोहिदास गाडगे

Political News Today: दिवसाची सुरुवात करताना सकाळी टिव्ही लावला की एका बाजुने संजय राऊत तर दुसऱ्या बाजुला नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांची अब्रूच काढताना दिसतात असं म्हणत माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांनी राऊतांसह राणे फडणवीसांना खडेबोल सुनावलेत. (Latest Marathi News)

रोज सकाळी एकमेकांची अब्रू काढणारे सामान्य लोकांच्या अडचणीवर बोलत नाहीत तर त्यांना एकमेकांच्या आब्रु काढण्यापलीकडे काहीच करत नाही यातून सामान्य जनतेचे कल्याण काय होणार असा खडा सवालच वळसेपाटलांनी भर सभेत मांडला. वळसेपाटील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील आदिवासी भागातील दौऱ्यावर असताना बोलत होते.

औरंगजेबच्या फोटोचे स्टेटस ठेवल्याच्या छोट्या गोष्टींनी दंगली व्हायला लागल्या आणि त्या दंगलीला सरकारचे संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटीलांनी (Dilip Walse Patil) केला आहे. (Political News)

तर पुढे लव जिहाद या प्रकरणावर बोलताना वळसेपाटील म्हणाले की, लव जिहादच्या नावाखाली हिंदु विरुद्ध मुसलमान,दलित विरुद्ध इतर असे वाद लावून त्यांची विभागानी करण्याचे कारास्थान सुरु असल्याची गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांनी केला आहे.

प्रेम विवाहतून हिंदु मुस्लिम मुल मुलीचे विवाह होतात. यामध्ये वय मर्यादा योग्य असेल तर तक्रार असण्याचे कारण नाही. पण जबरदस्तीने धर्मांत्तर करायला लावल्याच्या तक्रारी आल्या की वाद होत असल्याचे मतही वळसेपाटीलांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT