Maha Vikas Aghadi Maharashtra Band Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Band : बदलापुरातील घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक; येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

Satish Daud

मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादवून टाकलं आहे. अत्याचाराच्या या घटनेविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील माध्यमांना माहिती दिली.

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांची उपस्थिती होती.

या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "आजच्या बैठकीत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. कारण, महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे. त्यामुळे आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या घटना रोखाव्यात", असं संजय राऊत म्हणाले.

येत्या 24 तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, बदलापूर येथील घटनेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शिवसेना ईशान्य मुंबईच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी हाती दोर घेऊन महिलांनी आरोपीला फाशी देण्याच्या मागणी केली. त्याचबरोबर महायुती सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बदलापूर येथे चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आलेली शाळा ही शाळा भाजपची नेत्याची असल्याने पोलिसांनी मुद्दामहून कारवाईला दिरंगाई केली, असा आरोपही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटरून पोस्ट करत महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं. "लाडक्या बहिणीं'च्या लेकीने किती छळ सोसायचा? बदलापूर पाठोपाठ अकोल्यातील काजीखेड गावात एका शिक्षकावर ६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात? सरकारने 'फडतूस'गिरी बंद करा, राजीनामा द्या", अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT