Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav thackeray Video : आरोपीला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? बदलापूर अत्याचार प्रकरणावरावरून उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Uddhav thackeray on badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणावरावरून उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? असा सवाल करत ठाकरेंनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारानंतर संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या अत्याचाराच्या घटनेनंतर सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरत रेल्वे रोका केला. त्यानंतर या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. आरोपीला फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी शाळेचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या आरोपीलाही निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बदलापुरातील अत्याचार प्रकरण आणि आंदोलनावर भाष्य केलं. 'देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या आहेत. त्याचा वापर राजकारणासाठी वापर केला जात आहे. या प्रकरणाचा असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यायला हवं, असे ते म्हणाले.

'आपण काही राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही. संपूर्ण देशातील मुलींच रक्षण केले पाहिजे. आरोपीविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

'दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडलं होतं. या आरोपीला फासावर लटकवायला वेळ लागला. अशा प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेस विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. हाथरस, उन्नव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक आरोपींना फाशी झाली पाहिजे. आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. विधानसभेचे अधिवेशन कोरोना विषाणूमुळे दोन ते तीन दिवसांचे झाले होते. पण आमचे सरकार पाडण्यात आले. त्यामुळे हे विधेयक रखडवले आहे. हे विधेयक मांडून या आरोपींना शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह देखील आता स्कॉट मुक्त असून त्यांनी त्याला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे ते या आरोपीला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPSC Success Story : बस कंडक्टरची लेक पहिल्याच प्रयत्नात IAS झाली, वाचा डॉ. रेनू राज यांचा प्रेरणादायी प्रवास

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

SCROLL FOR NEXT