पुण्यात चोरट्यांनी चांदीच्या दुकानावर दरोडा टाकलाय. 50 ते 60 किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली. पाच ते सहा लाख रोकडही घेऊन गेले. तीन चोरट्यांनी गुरुवार पेठेतील दुकानावर दरोडा टाकला. सीसीटीव्हीत पोत्यामध्ये चांदी घेऊन जाताना चोरटे दिसत आहेत.
गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांनी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून आज शपथ घेतली. देवव्रत यांच्याकडे सध्या गुजरातची जबाबदारी आहे. आज त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली
रात्रभर झालेल्या पावसामुळे पुणे–नाशिक महामार्गावर वाकी परिसरात पाणी साचले आहे. या पाण्यातून प्रवासी वाहनं, कामगारांची वाहतूक आणि अवजड गाड्यांचा प्रवास सुरूच आहे. मात्र, पाण्याचा वेग आणि खोली यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. धोकादायक परिस्थिती असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये आज बंजारा समाज बांधवांचा विराट मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये लाखो बंजारा बांधव सहभागी होणार असून बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चाचे निवेदन शाळकरी मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्याव या मागणीसाठी जालन्यात आज बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा निघतोय.जालना शहरातील मस्तगड येथून मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून जालना शहरातील अंबड चौफुली येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा बांधवांची आहे.
पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री तीनच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक तास मुसळधार पाऊस कोसळत राहिला.
या अतिवृष्टीमुळे करंजी, मढीसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी झाडांवर आसरा घेतला. जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आजचे युवक, युवती एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना विचारमंच उपलब्ध करून देण्यासाठी समता संघर्ष संघटन व समता संघर्ष संघटन सांस्कृतिक मंच यांच्या वतीने शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेवर आधारीत विशेष युवकांसाठी "रेनी कार्निवल" संवाद तरूणाईचा या कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील पडघा पाच्छापूर रोड येथे करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक उत्तम जोगदंड होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका, शिल्पा कांबळे यांनी तरुणांशी संवाद साधला. यावेळी अन्याय, विषमता , अंधश्रद्धा, गुलामगिरी, हुंडाबळी या पोस्टरांची जाळून होळी करण्यात आली असून एक आगळ्या, वेगळ्या पद्धतीने सामाजिक संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष म्हणजे अभिनव उपक्रम घेण्यात आला.त्यात तरुणांची "संसद सवांद" भरवण्यात आली असून त्यात तरुणांनी आपली मते मांडली. तर उठाव मंच यांचे कवी संमेलन पार पडले.तर यावेळी युवकांनी ,विद्यार्थ्यांनी, गाणी, अभिवाचन , कविता सादर केल्या. बदलापूर येथून आलेल्या टीम ने कथन अंधाराला भेदणारं हे नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे, उपाध्यक्ष सदानंद गायकवाड, संघटक
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार
सकाळी १० वाजता १४ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल
मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीच्या पात्रात वाढ
नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा
रविवार पासून धरणक्षेत्रात ही पावसाची संततधार सुरू आहे
मुंबई सह उपनगरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे अशात मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुक पसरले आहे यामुळे यामुळे दृश्यमान देखील कमी झाले आहे याचा फटका रस्ते वाहतुकीला बसताना दिसत आहे यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील आढळून येत आहे
बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीजन्य पाऊस झाला बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव धारूर वडवणी परळी या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने माजलगाव मधील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून जनावरे व सुरक्षित जागीर जाण्याचा आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले आहे जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी काळजी घ्यावी अशी आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .
भंडाऱ्यात पहाटेपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं सुमारे दोन तास हजेरी लावली. यामुळे भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरात सर्वत्र जलमयस्थिती निर्माण झाली असताना भंडारा शहरातील महिला समाज शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी शिरलं आहे. यामुळे या शाळेला सध्या तलावाचं स्वरूप आलं असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही आता तारेवरची कसरत होणार आहे.
मराठा समाजानंतर आता बंजारा समाज हे आक्रमक झाला असून बंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यामध्ये विराट मोर्चाचे आयोजन केला आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शाळकरी मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप होणार आहे मोर्चामध्ये 50 हजाराहून अधिक बंदरा समाज बांधव सहभाग नोंदवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
आठवड्याचा पहिला दिवस नोकरदार वर्गांना ऑफिस गाठण्यासाठी लागत आहे विलंबन
ठाण्यातील तीन हात नका ते मुलुंड टोल नाका मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून संत गतीने वाहन रस्त्यावरती धावत आहे..
रस्त्यावरती पडलेले खड्डे ,अर्धवट सुरू असलेली कामे आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी वरती फटका बसत आहे ...
याच वाहतूक कोंडीचा प्रश्न घेऊन आज मनसे रस्त्यावरती उतरणार आहे..
वाहतूक कोंडीबाबत वाहतूक विभागाला जाब विचारणार आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसलाय. रविवारच्या सुट्टीनंतर आज कामाच्या पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांना लेटमार्कचा फटका बसणार आहे.
बीड जिल्ह्यात मध्ये रात्री धुवाधार पाऊस झाला बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटोदा आष्टी शिरूर या भागामध्ये पावसाने धोक्याची पातळी ओलांडली होती मध्यरात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी दिसत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरांमध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरला आहे जनावरांसह झाडही वाहून गेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी देवळाली दादेगाव या गावांचा संपर्क तुटला असून रस्त्यांवरही पाणी दिसत आहे शेतामध्ये तलावाचे स्वरूपाला असून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी व शेतकऱ्यांची व्यथा सरकारने जाणून घ्यावी व तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलउपसा पंपांचा वीजपुरवठा शनिवारी रात्री आणि रविवारी जायकवाडी परिसरातील मुसळधार पावसामुळे खंडित झाला. यामुळे आज शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा रात्री 2 वाजता वीज गेली. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे जुने आणि नवीन पंपगृह ठप्प पडले. मुसळधार पावसामुळे दुरुस्तीचे काम लांबले. पहाटे 5 वाजता पाऊस कमी झाल्यानंतर जुने जायकवाडी पंपगृह येथील वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर 5:30 मिनिटांनी पाणीपुरवठा सुरू केला. पावसामुळे जायकवाडी पंपस्टेशन वीज यंत्रणा रात्रभर कोलमडली होती. याचा थेट परिणाम पाण्याच्या टप्प्यांवर झाला असून अनेक भागातील टप्पे पुढे ढकलण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील भीमणी नदी पात्रात वाघ मृतावस्थेत दिसून आला. मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाघाचा मृतदेह नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सध्या वनविभागाने मृतदेह शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पडल्याने सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतकरी व मजूर शेतातील कामे आटोपून परतत असताना त्यांना भीमणी नदीच्या पात्रात पाण्यावर वाघाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. मात्र पथक पोचेपर्यंत वाघाचा मृतदेह वाहून गेल्याने त्याची आता शोधाशोध सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत असुन राञी झालेल्या पावसामुळे कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर आला आहे.त्यामुळे संजीतपुर गावातील पुल पाण्याखाली गेला आहे.गावाला जा ये करण्यासाठी असलेला एकमेव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला असुन परीसरातील सोयाबीन पीकाच मोठ नुकसान झाल आहे.सोयाबीन शेतात पाणी पाणी पाहायला मिळत आहे.
बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. नगर बीड रस्त्यावरील धानोरा येथील कांबळी तलाव भरला असून पुलावरून पाणी सुरू आहे. बीड कडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील नद्यांना पूर आले आहेत. दौलवडगाव महसूल मंडळात आणि गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्या वाहत्या झाल्या, उंदरखेल येथील प्रकल्प भरला आहे.देविनिमगावच्या नदीला पुर आला आहे. पुलावरून पाणी चालू आहे त्यामुळे देविनिमगाव धामणगाव रोड बंद झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेती पिकामध्ये तलावत स्वरूपाला आहे.
परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे तर आज सकाळी एका तासाच्या पावसामुळे परभणी शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर एका तासाच्या पावसामुळे परभणी शहरातील रस्त्यांवर पाणी पाणी साचून रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी गेले आहे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचे नाव द्यावं यासाठी काल कार रॅली आयोजन करण्यात आलं होतं मात्र पंधरा दिवसांमध्ये नवी मुंबईचे विमानतळा बद्दल नोटिफिकेशन काढलं नाही तर मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर बंद पडू असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे
आगरी कोळी समाज दि बा पाटील यांच्या साठी आता रस्त्यावर उतरणार आहे दहा लाख समाज रस्त्यावर उतरण्याची आमची ताकद आहे हा समाज आक्रमक आहे याची जाणीव सरकारला हवी
ठाण्यातील कॅडबरी जंक्शन जवळ पूर्व द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या वॉटर टँकर (MH 04 CU 7728) ला रिक्षाची जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या तीन व्यक्ती अडकल्या होत्या.
धाराशिव जिल्ह्यात गेली दोन दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे.या अतिवृष्टीमुळे कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळात शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे.या नुकसानीची धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह अनेकांच्या घराचे नुकसान झाल आहे त्यामुळे संसार उद्ध्वस्त झाले असुन शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी अशी मागणी कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
-दुबईत झालेल्या आशिया कपच्या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करत विजय मिळवला.....
- नागपुरातील लक्ष्मी भवन चौकात क्रिकेट प्रेमी चाहत्यांनी एकत्र येत जल्लोष केला,
- भारतीय गोलंदाजांनी आज प्रचंड ताकद दाखवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि विजयाचा झेंडा फडकावला. या ऐतिहासिक विजयाची आनंदलहरी थेट नागपूरपर्यंत पोहोचली....
- धरमपेठ परिसरातील लक्ष्मी भवन चौकात युवकांनी जल्लोषात फटाके फोडले, तिरंगा लहरवला आणि "भारत माता की जय" तसेच "वंदे मातरम"च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.....
- चौकात दुमदुमणाऱ्या "जय श्रीराम"च्या घोषणा आणि देशभक्तीच्या गजराने वातावरण भारावून गेले.....
- युवकांनी राष्ट्रध्वज फडकवत, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या रोषणाईत भारताच्या विजयाचा उत्साहाने आनंद साजरा केला.....
- दुबईच्या मैदानावरील भारताचा हा विजय नागपूरच्या रस्त्यांवर उत्सवात रूपांतरित झाला.
यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यावर जलविद्युत प्रकल्पाला 42 गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चातारी येथे या प्रकल्पा विरोधात महा जनआक्रोश सभा घेण्यात आली. या सभेमध्ये हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा असा ठरावा एक मुखी घेण्यात आला सोबतच न्यायालयामध्ये याचिका टाकून या जलविद्युत प्रकल्पांमध्ये जवळपास 60 हजार हेक्टर वरील सुपीक शेत जमीन जाणार आहेत.हा प्रकल्प नेत्यांच्या आणि कंत्राटदारांचा फायद्याचा असल्याने यापुढे या प्रकल्पाला जे समर्थन देईल अशा राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.
दापोली तालुक्यातील कर्दै समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करताना थार गाडी उलटून अपघात झाल्याच्या घटनेची जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली आहे तसेच हर्णे समुद्रकिनाऱ्यावर गाडी नेऊन पर्यटकांची हुल्लडबाजी सुरु होती असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांना जाण्यास बंदी घातलीय . त्याची अंमलबजावणीही तातडीने करत समुद्रकिनाऱ्यावर जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.अशा पर्यटकांवर पोलीसांकडून गुन्हे दाखल देखील केले जात आहेत.त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर गाडी नेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना आता चाप बसणार आहे.
गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे देशविघातक कृत्य करत असतात. सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल माओवाद्यास काल दिनांक १३/०९/२०२५ रोजी गडचिरोली पोलीस दलाने ताब्यात घेवून त्याला अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण १०९ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे..
हिंगोलीच्या वसमत तालुक्यात काल दुपारी ढगफुटी झाली आहे, सलग दोन तासात पडलेल्या पावसामुळे 20 गावे बाधित झाली आहेत तर वसमत तालुक्यातील आरळ व तेलगाव शिवारात मागील 18 तासांपासून शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी अक्षरशा उध्वस्त झाले आहेत, वीस दिवसांपूर्वी पोळा सणाच्या पूर्वसंध्येला या शेतकऱ्यांच्या शेतातील मूग उडीत पावसामुळे नष्ट झाला तर आता दिवाळीच्या तोंडावर तोडणी ला आलेला सोयाबीन निसर्गाने वाहून नेले यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत, कापूस हळद या सह फळबागा देखील डोळ्याच्या पुढे पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसत असल्याने आता आमच्यासमोर शासनाच्या नुकसान भरपाई शिवाय पर्याय नसल्याचं या भागातील शेतकरी सांगत आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.