Marathwada crops in crisis  Saam TV
महाराष्ट्र

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांनी माना टाकल्या

Rain in Maratahwada In August : मराठवाड्यात ऑगस्टमध्ये 85% हून कमी पावसाची नोंद झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांता घेतली आहे. पावसाने दडी मारल्याने मराठवाड्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. मराठवाड्यात ऑगस्टमध्ये 85% हून कमी पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळे पिके माना टाकू लागली आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मान्सूनची स्थिती समाधानकारक नाही. यामुळे खरीप पिकांच्या भवितव्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड आणि लातूरमध्ये ऑगस्टमध्ये सर्वाधिक 92 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर परभणी 91 टक्के, हिंगोली 88 टक्के, नांदेड 85 टक्के, जालना 84 टक्के, उस्मानाबाद 82 टक्के, औरंगाबाद 74 टक्के पावसाची कमतरता आहे.  (Maharashtra News)

जुलै महिन्यात पावसाचा प्रमाण समाधानकारक होतं. त्यानुसार 1 जूनपासून या भागात एकूण 13% कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या. अधून मधून येणाऱ्या हलक्या पावसावर खरीप पिके डोलू लागली होती.परंतु गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने हजेरी लावली नसल्याने पिकांचं मोठं नुकसाना होत आहे. (Latest Marathi News)

पावसाच्या कमतरतेमुळे मका, सोयाबिन, मुग, उडीद, कपासी, तुर, बाजरीसह इतर पिकांनी कडक उन्हात माना टाकायला सुरूवात केली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप व रब्बी पिके वाया गेली होती. उन्हाळी पिकेही अतिवृष्टीने वाया गेली होती. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT