देवेंद्र फडणवीस  SaamTvnews
महाराष्ट्र

आपल्याला सत्ता हवीय, जनतेचे कल्याण करण्यासाठी - फडणवीस

भविष्यात काय होणार आहे याची चाहूल लागल्यामुळे आपले काही लोक पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये (NCP) जात आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : आपल्याला सत्ता हवी आहे, ती घर भरण्यासाठी नाही, वसुलीसाठी नाही; तर सर्वसामान्यांचे कल्याण करण्यासाठी सत्ता हवी आहे. असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते सांगलीमध्ये (Sangli) नाना महाडिक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यादरम्यान बोलत होते.

हे देखील पहा :

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, येत्या काळामध्ये समाजाकरिता काम करायचे असून निवडणूक हारणे अथवा जिंकणे महत्वाचे नाही. जो समाजामध्ये राहून काम करतो त्याच्या पदरी नेहमीच यश येते. एखाद्या अपयशाने कोणीही मागे जात नाही. अपयशानंतरही जो समाजात जाऊन काम करतो समाज त्याचा पुरस्कार करतो.

भविष्यात काय होणार आहे याची चाहूल लागल्यामुळे आपले काही लोक पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये (NCP) जात आहेत. मात्र, काहीही हरकत नाही कारण भाजपला (BJP) या वाळवा आणि शिराळा मतदार संघामध्ये थांबवणे आता कोणालाही शक्य नाही. सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व अधिक वाढवायचे असून त्यासाठीच आपले प्रयत्न सुरु असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT