Palghar News: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतीचंही मोठं नुकसान केलं आहे. पालघरमधील वडराई येथील दोन झाडांवर वीज पडल्याची घटना समोर आली आहे. वीज पडून दोन्ही झाडांना अशी आग लागली.
नारळाची दोन्ही झाडं जळून खाक झाली आहेत. पालघरच्या पश्चिमेस असलेल्या वडराई येथे एका नारळाच्या आणि दुसऱ्या ताडाच्या झाडावर वीज पडली. वीज पडून आग लागलेल्या झाडांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. (Palghar News)
पालघरमध्ये गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण होतं. कालपासून भागात जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली . पालघर , डहाणू , तलासरी , वाडा ,विक्रमगड , कुडूस या भागात मध्यरात्री पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसल्या.
या पावसामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, काजू, मिरची सह जिल्ह्यातील हजारो हेक्टरवर असलेल्या रब्बी पिकांना याचा फटका बसला असून जिल्ह्यातील वीट उत्पादक व्यावसायिकांचंही मोठ नुकसान झालं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.