साताऱ्यात चाललय काय? एकाच दिवशी 5 जणांची गळफास घेवून आत्महत्या
साताऱ्यात चाललय काय? एकाच दिवशी 5 जणांची गळफास घेवून आत्महत्या  Saam TV
महाराष्ट्र

साताऱ्यात चाललय काय? एकाच दिवशी 5 जणांची गळफास घेवून आत्महत्या

ओंकार कदम

सातारा: सातारा जिल्ह्यात विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी गळफास लाऊन स्वतःचे आयुष्य संपवल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. आत्महत्येमध्ये कौटुंबीक वाद आणि आजारपण अशी कारणे समोर आली आहेत. गणपत कणसे वय 35 राहणार विहे, पाटण, सुमित गायकवाड वय 28 राहणार वडगाव हवेली, कराड, अमोल पाटील वय 37 राहणार सुपने, कराड, अक्षय इंगवले वय 27 राहणार किडगाव, सातारा, पोपट ढेडे वय 40 वाई, भुईंज, अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्महत्या करणारांमध्ये तरुण वर्ग जास्त आहे. आज सकाळी बारावी परिक्षेचा अभ्यास होत नाही म्हणून एका विद्यार्थीनेने आत्महत्या केली आहे. कोरोनामुळे सगळ्या गोष्टी जाग्यावर ठप्प झाल्या त्यामुळे अनेक लोक नैराश्यात गेले आणि त्यांनी आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थांनी आत्महत्या केलेल्या आपण पाहिल्या. जशी परिस्थीती पुर्व पदावर येते पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागतात आणि विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी नैराश्यात जातात आणि त्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलतात.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

SCROLL FOR NEXT