Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

सांगली - कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली

सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि पावसाची संततधार यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सांगली : सांगलीच्या (Sangli) चांदोली धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि पावसाची संततधार यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.

शालेय विद्यार्थी वारणा व कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा कर्मचारी वर्ग चिकुर्डे मार्ग जात आहेत. सध्या वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, पुराचे पाणी पात्रा बाहेर आल्याने नदी काठावरील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. संततधार पावसामुळे ओढा, वगळी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर शेती पिकात पाणी साचून राहिले आहे. ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस पाटील ऐतवडे खुर्दने नदी काठावरील लोकांना सतर्कचा इशारा दिला असून प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याचे सांगितले आहे.

चांदोली धरण भरल्याने धरणातून 5600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्वतवाडी येथील लोकांना स्थलांतर होण्याच्या सूचना प्रत्यक्ष भेटून ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहे. कुरळप पोलीस (Police) पूर परिस्थितीची पाहणी करून या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. संततधार पावसामुळे नदी काठावरील लोकांना महापुराची धास्ती लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता; तुमचे नाव तर नाही ना?

Heart disease risk factors: 99% हार्ट अटॅक येण्यामागे हे 4 घटक कारणीभूत; संशोधनातून स्पष्ट

Weekly Horoscope: या राशींसाठी एखादा मोठा निर्णय फायदेशीर ठरेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आईने आधी 3 वर्षाच्या लेकराला संपवले, नंतर स्वतः ही केली आत्महत्या; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 48 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

SCROLL FOR NEXT