Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून भ्रष्टाचार सुरू; दानवेंचा आरोप

कोळशाचे राज्याकडे 3 हजार कोटी थकीत - दानवे

लक्ष्मण सोळुंके

जालना - राज्यात सध्या कोळसा तुटवडा निर्माण झाल्याने काही विद्युत प्रकल्पात दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा उपलब्ध असल्याने राज्यावर पुन्हा वीज संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहबे दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्यात कोळशाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्या जात असल्याचा आरोप राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

हे देखील पहा -

केंद्र सरकारच्या कोळसा खात्याकडून सर्व राज्यांना पत्र पाठवून कोळशाचा साठा करून ठेवण्याचं आवाहन केलं होतं. कोळशाचे राज्याकडे 3 हजार कोटी थकीत असल्याचं सांगत राज्य कोळसा नाही असं सांगत असलं तरी राज्याकडून वीज निर्मिती करून वीज विकली जात असल्याचा आरोप देखील दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

तरीही आमच्याकडून कोळसा पुरवण्यात कोणतीही कमी नसताना राज्यात कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून राज्यात भ्रष्टाचार करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT