Raosaheb Danve
Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून भ्रष्टाचार सुरू; दानवेंचा आरोप

लक्ष्मण सोळुंके

जालना - राज्यात सध्या कोळसा तुटवडा निर्माण झाल्याने काही विद्युत प्रकल्पात दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा उपलब्ध असल्याने राज्यावर पुन्हा वीज संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहबे दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्यात कोळशाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्या जात असल्याचा आरोप राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

हे देखील पहा -

केंद्र सरकारच्या कोळसा खात्याकडून सर्व राज्यांना पत्र पाठवून कोळशाचा साठा करून ठेवण्याचं आवाहन केलं होतं. कोळशाचे राज्याकडे 3 हजार कोटी थकीत असल्याचं सांगत राज्य कोळसा नाही असं सांगत असलं तरी राज्याकडून वीज निर्मिती करून वीज विकली जात असल्याचा आरोप देखील दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

तरीही आमच्याकडून कोळसा पुरवण्यात कोणतीही कमी नसताना राज्यात कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून राज्यात भ्रष्टाचार करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT