परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका

मुंबई-गोवा महामार्गवर माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली असून चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रवाशांच्या चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासात चाकरमानी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. माणगाव पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. (On the way back, Ganesh devotees were hit by a traffic jam)

हे देखील पहा -

गौरी गणपतीचे 14 सप्टेंबर रोजी विसर्जन झाल्यानंतर आज 15 सप्टेंबर रोजी कोकणातील चाकरमानी हे पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी गणेशभक्तांच्या वाहनाची संख्या वाढली असल्याने माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर चार किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

त्यामुळे परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. वाहतूकही धीम्या गतीने सुरू असली तरी दोन ते तीन तास प्रवाशांना कोंडीतून निघण्यास वेळ लागत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरांगे पाटील करणार मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

SCROLL FOR NEXT