परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रवाशांच्या चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासात चाकरमानी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. माणगाव पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. (On the way back, Ganesh devotees were hit by a traffic jam)

हे देखील पहा -

गौरी गणपतीचे 14 सप्टेंबर रोजी विसर्जन झाल्यानंतर आज 15 सप्टेंबर रोजी कोकणातील चाकरमानी हे पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी गणेशभक्तांच्या वाहनाची संख्या वाढली असल्याने माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर चार किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

त्यामुळे परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. वाहतूकही धीम्या गतीने सुरू असली तरी दोन ते तीन तास प्रवाशांना कोंडीतून निघण्यास वेळ लागत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT