विवाहित मुलींचे हक्क
एकदा मुलींच लग्न झालं की ती परकी होते. हे विधान वाचायला जितकं सोपं वाटतं तितकं ते मुळीच नाही. लग्नानंतरही मुलींना तिच्या माहेरी हक्काने जाता येतं. तसेच अनेक हक्क सुद्धा त्यांना दिले जातात.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की, फक्त विवाहित असल्याच्या कारणावरून मुलींना कोणत्याही सरकारी कल्याणकारी योजनेपासून वगळण्यात येणार नाही. असा भेदभाव संविधानातलया समानतेच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.
लग्नामुळे मुलीचं माहेराशी असलेलं नातं तुटत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मुलगी विवाहित असली तरी ती आपल्या तिच्या कुटुंबाचा भाग कायम असते.
लग्न झालेल्या महिलांना योजनांचा लाभ देताना वैवाहिक स्थिती नाही. तर आर्थिक गरज आणि पात्रता विचारात घेणं महत्वाचं आहे. गरजू व्यक्तींना मदत मिळणं हेच कल्याणकारी योजनांचं मुख्य उद्दिष्ट आहे.
लग्न झालेल्या आणि अविवाहित मुलींमध्ये भेदभाव करणं योग्य नाही असं न्यायालयाने म्हंटलं आहे. सर्व पात्र महिलांना समान संधी आणि लाभ मिळणं हा घटनात्मक अधिकार आहे असं न्यायालयाने सांगितलं.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे विवाहित महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकारांना जास्त बळ मिळणार आहे. बऱ्याच शिष्यवृत्ती, आर्थिक मदत आणि कल्याणकारी योजनांमध्ये त्यांना सहभागी करण्यावर भर दिला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.