काँग्रेसने स्वतंत्र गट स्थापन केला आहे.
.निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्यासोबत ,आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही ...
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर होणार अंतिम निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत होणार एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक
मनसेचे नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया
ठाकरे गटाचे सचिन बासरे यांनी व्यक्त केली प्रचंड नाराजी
दोघे भाऊ एकत्र आल्याने मराठी माणसाने आनंद व्यक्त केला
अशा परिस्थितीत असा निर्णय घेतला जात असेल तर पक्ष सोडा ज्या लोकांनी मते मागितले. तुमच्यासाठी फिरले, जयजयकार केला. झेंडे हाती घेतले. त्यांचा तरी विचार करायला पाहिजे होता
आमचे चार बंडखोर आमच्यासोबत येतील
सात नगरसेवक सुरक्षित स्थळी, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसापासून सुरू असलेले माकपचे आंदोलन स्थगित करण्याचे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले आहे. मागील सात तासांपासून आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागले असून काही निर्णयासाठी वेळ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधेरी पूर्वेकडील शांतिधाम सोसायटी, म्हाडा 3B इमारतीत मोठी दुर्घटना टळली
फ्लॅट क्रमांक 304 मधील स्लॅब अचानक कोसळला
मालक श्वेता शाम सावंत यांच्या घरात घटना
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
घटनेनंतर संपूर्ण इमारतीत भीतीचे वातावरण
कल्याण शीळ रोड सोनारपाडा परीसरात CNG गाडीने घेतला पेट
सुदैवाने जीवितहानी नाही
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी आता मुंबई गाठत आझाद मैदानावर उपोषण केलं आहे. यामुळे हजारो धनगर बांधव आझाद मैदानावरती पोहोचत आहेत. मात्र पोलिसांनी धनगर समाजांना चाहूबाजूने वेढा टाकला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्र लिहून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच त्यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
लातूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपाकडून ही निवडणूक कार्यकर्त्याची असल्याने कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत न्याय द्यावा याकरिता , आमदार खासदार यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे आदेश देण्यात आलेत, तर दुसरीकडे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी पानगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने लातूर भाजपाच्या राजकारणात नेमकं चाललय काय असा प्रश्न उपस्थित टाकला आहे.
१८जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील गॅरेज चालक शादाब रियाज शेख हा बाबुरावर नगर परिसरातील मोकळया मैदानात एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी रात्री १२ वाजता छापा टाकला. कारवाई दरम्यान आरोपी शादाब शेख, याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ व मोटार सायकल असा एकूण २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत धुळ्याच्या बोराडी गावात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करण्यात आली, यावेळी आदीवासी बहुल गाव असलेल्या बोराडी गावकऱ्यांच्या वतीने अभिनेत्री कुलकर्णी यांचे जंगी स्वागत करण्यात आले, आदीवासी पारंपरिक नृत्यातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले,
शासकीय योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची बोराडी गावाला भेट देत, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन केले आहे, यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघावयास मिळाले आहे.
रायगडचे पालक मंत्री पद स्थगित झाल्या पासून रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकिय ध्वजारोहणावरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रश्शी खेच सुरु होती. गतवर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र दिनी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या मुख्यालयाचे ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला होता. नाराजी व्यक्त करीत मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय मान्य केला केला होता. आता या वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणाला मान मिळणार यावरून चर्चा सुरु असताना मंत्रालयाच्या सा मान्य प्रशासनाने परिपत्रक काढत यादी जाहिर केली असून यामध्ये रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आहे. यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाच वातावरण पहायला मिळत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 3 जानेवारी रोजी साडेतीन वर्षांचा वाघ आणण्यात आला होता. वन्यजीव विभागाच्या नियोजनानुसार या वाघाला सुरुवातीला सुमारे 1200 मीटर क्षेत्रफळाच्या फिन्सिंग (तारबंदी) केलेल्या परिसरात ठेवण्यात आले होते. मात्र, 18 जानेवारी रोजी या वाघाने कंपाउंडवरून उडी मारत फिन्सिंग क्षेत्राच्या बाहेर जाऊन थेट जंगलात प्रवेश केला.
जंगलात प्रवेश केल्यानंतर या वाघाने आतापर्यंत तीन शिकार केल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून देण्यात आली आहे. वाघाने मुक्त हालचाली करत आजपर्यंत सुमारे 20 किलोमीटर अंतर पार केले असून, सध्या तो पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्याच्या हद्दीतच स्थिरावल्याचे निरीक्षणात आले आहे....
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाचा पेपर देणारे विद्यार्थी पालिकेच्या बाहेर आले एकत्र
परीक्षेचे केंद्र लांब आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार
पुण्यातील विद्यार्थ्यांचे केंद्र सांगली, कोल्हापूर, सोलापूर सारख्या जिल्ह्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची तक्रार
खाजगी केंद्रावर परीक्षा न घेता अधिकृत परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी
पवन कदम हे या पूर्वी देखील नगरसेवक होते. नुकतेच त्यांच्या पत्नी पल्लवी कदम यांनी उपमहापौरपद भूषविले होते. आज झालेले नगरसेवकांच्या बैठकीत पवन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसेने डेव्हलपमेंट वर आम्हाला पाठिंबा दिला आहे
महायुतीला पाठिंबा दिला आहे
ज्या ठिकाणी सत्ता येईल त्या ठिकाणी महायुतीचा महापौर असेल
मुंबईतील ठाकरेंची नगरसेविका शिंदे गटात गेल्याच्या चर्चेवर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
डॉ सरिता म्हस्के कुठ आहेत मला माहित नाही
मनसेने आम्हाला पाठिंबा दिला तर जमत नाही का, राष्ट्रवादी देते तेव्हा चालते का
मुंबईतील निर्णय लवकरच होईल
आम्हाला अनेकजण पाठिंबा देतात महायुतीला पाठिंबा आहे
त्यात भाजप नेते नाराज आहेत असे मला वाटत नाही
भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार
घराणेशाहीचा आरोप होत असल्याने पक्ष आदेशानुसार जिल्हा परिषदेची उमेदवारी मागे घेतल्याची प्राथमिक माहिती
अर्चना पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील तेर आणि केशेगाव या दोन्ही गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी केली होती दाखल
अर्चना पाटील यांनी मागील टर्मला धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते
अर्चना पाटील यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने जिल्ह्यात चर्चा
जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली नाही. थोड्याच वेळात नवीन तारीख दिली जाणार आहे.
५० टक्केंची मर्यादा ओलांडली आहे तिथे पुढे काय कार्यवाही होईल हे स्पष्ट होईल.
उरलेल्या २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. सुप्रीम कोर्टाचे जो पर्यंत आदेश येत नाही तो पर्यंत निर्णय होणार नाही.
५० टक्केच्या मर्यादेत राहूनच निर्णय दिला जाईल का यावर अवलंबून असेल.
नांदेडच्या कंधारमध्ये गाळेधारक आणि भाजी विक्रेत्यांमध्ये नेहमी वाद होत आहे. गाळेधारकांच्या दुकानासमोर भाजी विक्रेत्यांना बसण्यास गाळेधारकांनी विरोध केला आहे. कंधार नगरपालिकेने मुख्य रस्त्याच्या बाजूला कॉम्प्लेक्स काढून गाळेधारकांना भाडेतत्त्वावर दुकाने वाटप केली आहेत. परंतु या गाडीधारकांच्या दुकानासमोर भाजी विक्रेते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहेत. या भाजीविक्रेत्यांना गाळेधारक आता दुकानासमोर बसण्यास तीव्र विरोध करत आहेत.
महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला घवघवीत यश
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा ११९ जागांवर विजय
महापालिकेतील एकूण १६५ नगरसेवांपैकी ११९ नगरसेवक भाजपचे
पुण्यातील भाजप चे संभाव्य महापौरपदासाठी नावं
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आणि त्यांचे बंधु राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे भाजपमध्ये...
समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपची वाखरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी....
काळेंच्या प्रवेशामुळे पंढरपुरात भाजपला बळ....
आमदार अभिजीत पाटील यांच्या हाती राष्ट्रवादीचे सूत्रे आल्याने काळे गट भाजपमध्ये दाखल....
आठ पैकी तीन जिल्हा परिषद गटामध्ये काळे निर्णायक ताकद
राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारून परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागेवर आपल्या समर्थकासह आज बुधवारी दुपारी १:४५ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याने परंडा तालुका शिवसेनेला खिंडार पडले असून, आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचला आहे.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत या व्यंगचित्राचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले
उद्घाटना वेळी सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या बिहार भवनचे पोस्टर फाडून केले उद्घाटन
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र द्रोहयाच्या विरोधात प्रसिद्ध व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी हे व्यंगचित्र प्रदर्शन भरवलं असून त्याचं उद्घाटन सुषमा अंधार यांच्या हस्ते झालंय.
नाशिकच्या मालेगाव महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या इस्लाम पार्टी व समाजवादी युतीला चाळीस जागा मिळाल्या असल्याने बहुमतासाठी केवळ ३ सदस्यांची गरज असतांना कॉंग्रेस ने त्यांना पाठींबा दिला आहे,अशा ही परिस्थितीत इस्लाम पार्टीचे ३५ व समाजवादीचे पाच अशा चाळीस नगरसेवकांचा सत्कार झाल्यानंतर हे सर्व नगरसेवक आज पहाटेच्या सुमारास अचानक सहलीला गेल्याची माहिती सुत्रांनी दिला आहे,सर्व नगरसेवक एकसंघ असतांना त्यांना सहलीला बाहेर का पाठवण्यात आले याबाबत चर्चा होत आहे.
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी निवडणुका वेगळ्या लढल्या असल्या तरी महायुतीमध्येच सत्ता स्थापन होणार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन केली जाईल
भाजपासोबत सहकार्य घेऊन विकासकामे केली जातील
मनसेलाही विकासासाठी एकत्र येण्याचीच भूमिका असल्याचे मत
मनसे नेते राजू पाटील हे वैयक्तिक मित्र असून विकासासाठी एकत्र असणे गरजेचे
मनसेकडून शिवसेना-महायुतीला समर्थन देण्यात आले आहे
सत्तास्थापनेचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी शिंदे साहेबांची बैठक होण्याची शक्यता
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा तहसील कार्यालयात आज उमेदवारी नामनिर्देशन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार दाखल झाले आहेत.एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने तहसील कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंढरपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे सगळी सूत्रे आली आहेत. आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसील कार्यालया पर्यंत रॅली काढली.
चाळीस वर्षांच्या प्रस्थापित नेत्यांना घरी बसवण्याचं काम आपण या निवडणुकीत करू असा दावा आमदार अभिजीत पाटील यांनी केला आहे पंढरपूर मध्ये अभिजीत पाटील विरुद्ध परिचारक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कौटुंबिक आणि राजकीय अडचणींमुळे पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तीवाद पार पडला.. तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बदलापूर जवळच्या बेंडशेडमध्ये इरसाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
भूमाफियांकडून सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू
शेकडो झाडांची कत्तल, महसूल आणि वनविभागाची भूमिका संशयास्पद
कल्याण डोंबिवली मधील शिवसेनेचे ५३ नगरसेवक कोकण भवन येथे दाखल
पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात येणार
महायुतीचा महापौर निवडून येणार
आमच्या संपर्कात इतर पक्षांचे नगरसेवक नाहीत
बस मधील नगरसेवक दाखल
पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड
पुण्यातील तळजाई परिसरात २५ ते ३० गाड्यांची तोडफोड
सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
काल मध्यरात्री ४ जणांकडून वाहनांची तोडफोड
पुणे जिल्हा परिषदेत सध्या सत्तासंतुलनाची स्थिती दिसून येते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा पारंपरिक प्रभाव अजूनही अनेक भागांत जाणवतो, तर दुसरीकडे भाजपने गेल्या काही वर्षांत संघटन मजबूत करत आपली पकड वाढवली आहे.
वर्धा जिल्ह्यात नगर परिषदेत उपाध्यक्ष पदासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला
चार नगर परिषदेत एक तर एका नगर परिषदेत अडीच वर्षांनी बदलणार नगर उपाध्यक्ष
वर्धा जिल्ह्यात तीन नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष पदासह बहुमत, दोन नगर परिषदेत नगराध्यक्ष पद नसलं तरी बहुमत
ठाण्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नगरसेवकांची बैठक आज दुपारी आनंद आश्रम या ठिकाणी पार पडणार आहे.
बैठकीला 75 नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडणार आहे. तसेच कोकण भवन या ठिकाणी कधी नोंदणी करण्यासाठी जाण्या बाबत निर्णय घेतला जाणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 53 नगरसेवक डोंबिवलीतून बसने मुंबईतील कोकण भवनकडे रवाना
आज कोकण भवन मध्ये गट स्थापन करन्याच्या प्रक्रियेसाठी सर्वांचा एकत्र प्रवास सुरू आहे
तर गटनेतेपद कोणाकडे असणार याबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अड्याळ ते किटडी या मार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका वाघाने भररस्त्यात दर्शन दिले.
रस्ता ओलांडताना वाघाने थेट एका वाहनधारकाचा रस्ता अडविल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
विंचूर येथील वाईन पार्क परिसर तसेच मोमीनपुरा भागात छापा टाकत पोलिसांनी तब्बल ३ किलो ९ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली
याची अंदाजे किंमत २२ लाख ५ हजार ६३० रुपये आहे
या कारवाईदरम्यान पोलिसांनी अमली पदार्थांसह ५ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल फोन, तसेच ३५ हजार रुपये किंमतीची MH 15 GW 6623 क्रमांकाची स्कूटर देखील ताब्यात घेतली आहे.
मी गाफील राहणारा पुढारी नाही माझी 100% तयारी झाली आहे सोबत आला तरी ठीक नाही आला ठीक तरी त्यांच्या शंभर टक्के निकाल लावणार
हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे मोर्चे काढणारे हिंदुत्वाला ज्यांनी पक्षाने विरोध केला त्यांच्यासोबत आज बैठका घेत आहेत हे दुर्दैव आहे असे शब्दात योगेश कदम यांनी घटक पक्ष भाजपाचा समाचार घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रचार रॅलीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी कलीम छोटू कुरेशी याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी फेटाळला. तर सहआरोपी हबीब छोटू कुरेशीला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
पाचव्या दिवशी उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी पाऊस
जिल्हा परिषदेसाठी ७१ आणि पंचायत समितीसाठी १२४ अर्ज
अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांकडून शक्ती प्रदर्शन
उद्धव ठाकरे सेनेकडून पुन्हा एकदा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे निवडणूक रिंगणात
संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटाकडून भरला उमेदवारी अर्ज
मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप–शिवसेना (शिंदे गट) वाटाघाटी तेजीत
मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता
नाशिकमध्ये भाजप स्वबळावर सत्तेचा दावा, मात्र तरीही तडजोडीचे संकेत
मुंबईत भाजप–शिवसेना युती, नाशिकमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना–राष्ट्रवादी लढत
मुंबई महापौरपदावरून तणाव, शिवसेनेची अडीच वर्षांची मागणी
मात्र भाजप पाच वर्षे महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम
मुंबई महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये सेनेला पदांची तडजोड शक्य
नाशिकमध्ये महापौरपद भाजपकडेच राहण्याची शक्यता
उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, प्रभाग समित्या आणि विषय समित्यांची पदे सेनेला मिळण्याची शक्यता
नाशिकच्या मालेगाव महापालिकेत यंदा स्वीकृत सदस्यांची संख्या वाढणार आहे,शासनाच्या बदलेलेल्या धोरणा नुसार हा बदल होणार आहे.या पुर्वी मालेगाव महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य निवडले जात होते मात्र नविन नियमानुसार त्यात तीन सदस्यांची भर पडणार असल्याने इच्छूकांच्या आशा बळावल्या असून,इस्लाम पार्टी चे चार,शिवसेना व एम आय एम चे प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लागणार आहे.महापौर नियुक्ती नंतर ही निवड होणार आहे.
इचलकरंजी, वस्त्रनगरीच्या राजकारणात नेहमीच दबदबा असलेल्या आवाडे घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात पदार्पण करीत आहे. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आज त्या हातकणंगले तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे या तीन पिढ्यांनंतर आता सानिका आवाडे या राजकीय क्षेत्रात सक्रीय होत आहेत. नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत सानिका आवाडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. सानिका आवाडे आता त्या कोरोची जिल्हा परिषद् मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर ए आपले नशीब आजमावणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात सानिका यांचे वडील व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषदेतून प्रतिनिधित्व केले होते. वडिलांप्रमाणेच सानिका यांनीही महापालिकेऐवजी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आवाडे परिवारतील चौथी पिढी आता राजकारणात प्रवेश करीत. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने आमदार खासदार यांच्या मुलांना निवडणूक न लढवण्याच्या सूचना करून घराणेशाहीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता. आता जिल्हा परिषदेमध्ये अनेक नेते आमदार खासदारांच्या कुटुंबीयांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे आता भाजप कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेला आहे.
कडवई जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे शिवसेना उबाठाकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कडवई जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आता जरी दोन गट पडले असले तरी ज्यांनी आमच्या पक्षाचं वाटोळं केलं त्यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनात चीड आहे, आणि शिवसैनिक त्यांना या निवडणुकीत धडा शिकवतील. तसेच या ठिकणी शिवसेना आणि मनसे युती आहे.. त्यामुळे आपला पुन्हा एकदा विजय होईल असा विश्वास संतोष थेराडे यांनी व्यक्त केला..
भुसावळ येथे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुलीवर बोलेरो वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर डिव्हायडरला धडकला असून सुदैवाने या अपघातात बोलेरो मधील सहा ते सात प्रवासी थोडक्यात बचावले आहे. वांजोळा चौफुलीवर सातत्याने अपघात होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच माजी आमदार संतोष चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पंढरपुरात उद्या विठ्ठल रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. मंदिरात आज पासूनच लगीन घाई सुरू झाली आहे. विवाहाच्या निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत दिव्यांच्या रोषणाईने मंदिर व परिसर उजळून निघाला आहे.
ही रोषणाई देवाचे मंदिर,शिखर, पश्चिमद्वार,संत नामदेव पायरी,संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप,तुकाराम भवन आदी ठिकाणी करण्यात आली आहे.
नागपूरच्या जामठा मैदानावर भारत-न्यूझीलंड टी-२० सामना होणार
सामना मैदानावर, पण पोलिसांची खरी कसोटी रस्त्यावर पवाहतूक व्यवस्थापन करताना पाहायला मिळणार आहे....
१०० अधिकारी आणि ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त असणार...
ड्रोन आणि AI आधारित निरीक्षण प्रणालीचा वापर.
जामठा मैदानाच्या ६० एकर परिघात वाहनतळ व्यवस्था.
वर्धा मार्ग, समृद्धी महामार्ग, छत्तीसगड मध्यप्रदेश अमरावती मार्गांमुळे कोंडीची शक्यता.
जड वाहतुकीसाठी विविध वळण मार्ग निश्चित, वाहतूक शाखा सतर्क.
छत्रपती चौक ते डोंगरगाव टोल नाका मार्ग सामना आधी आणि नंतर प्रत्येकी २ तास जड वाहतुकीस बंद.
कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी टाळण्याचे पोलिसांचे नियोजन, मात्र यशस्वी होणार की मनस्ताप देणार याकडे लक्ष..
महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या ८५ तक्रारी ११ जणांवर गुन्हे दाखल
तर कारवाईत ८६ लाखाच्या रोकड सह बारा लाखाची दारू आणि २७ लाखाचे अंमली पदार्थ जप्त
आचारसंहिता काळात ८५ तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यात ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
85 तक्रारीची चौकशी करण्यात आली असून तथ्य आढळला 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर शेतक-यांनी गव्हाची पेरणी केली आहे,गेल्या काही दिवसां पासून मनमाड परिसरात सध्या ढगाळ वातावरण राहत असून या बदलत्या वातावरणाचा परिणाम गहू पिकावर होत असून,त्यामुळे त्यावर करपा,मावा रोगाचा प्रार्दुभाव दिसून लागल्याने शेतक-यांना रोगाला अटकाव करण्यासाठी महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याच चित्र पहावयास मिळत आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ निमित्ताने आज अनेक शाळांना सुट्टी जाहीर
पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना आज २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी
पपुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या टप्प्याच्या दिवशी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या सरकारी आणी खाजगी शाळांना आज बुधवार सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
यवतमाळच्या पांढराकवडा येथील राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांच्या जीवित्याला धोका निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी शाळेचा मार्ग सुरक्षित करण्याच्या मागणीसाठी चक्क गावातील रस्त्यावर उतरून उडानपुला जवळ तीव्र आंदोलन केले.आम्हाला अंडरपास बोगदा द्या अन्यथा हे उड्डाणपूल नकोच अशी एकच ठाम मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली.
राज्यातील २९ महापालिकांवर नगरसेवकांच्या मानधनामुळे वार्षिक ४० कोटींचा भार.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत २,८६९ नगरसेवक निवडून आले.
सर्व नगरसेवकांच्या मानधनासाठी दरमहा ३ कोटी ३४ लाखांहून अधिक खर्च.
सर्वसाधारण सभांच्या भत्त्यामुळे वार्षिक १ कोटी ३७ लाखांचा अतिरिक्त खर्च.
चार वर्षांनंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसाठी वाहन खरेदी.
नव्या वाहनांसाठी एकूण १५ कोटी ६६ लाखांचा भार महापालिकांवर.
२९ महापौरांच्या वाहनांसाठी ८ कोटी ७० लाख खर्च अपेक्षित.
उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या ५८ वाहनांसाठी ६ कोटी ९६ लाख खर्च.
वाहनांच्या इंधन खर्चासह चालकांचे वेतनही महापालिकेवर.
प्रत्येक नगरसेवकासाठी मोबाईल सिम आणि मोबाईल बिलांचाही खर्च.
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकांत लोकप्रतिनिधींची सत्ता सुरू.
मुंबईसह राज्यातील महापालिकांची तिजोरी सुरुवातीलाच ताणाखाली.
जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी ५०९ उमेदवारांकडून अर्ज दाखल,अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे
जिल्हा परिषद साठी १ हजार ८७२ तर पंचायत समिती साठी २ हजार ७७५ अर्जाची विक्री
जिल्हा परिषदेसाठी २०४ उमेदवारांकडून आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल
खेड तालुक्यातून ३४ भोर ३१ इंदापूर ३० दौंड २३ हवेली १७ बारामती १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत
सर्वात कमी पाच उमेदवारी अर्ज जुन्नर तालुक्यातून दाखल झाले आहेत
पंचायत समिती साठी ३०५ उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत यात खेड तालुक्यातून ५४ बारामती ४९ भोर एकोणचाळीस मुळशी अडतीस शिरूर २१ दोन पुरंदर तालुक्यातील १५ अर्ज दाखल झालेत.
सर्वात कमी ९ अर्ज जुन्नर दाखल झाल्या आहेत..
आज शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षासह अपक्ष ही अर्ज दाखल करणार...
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह यावर सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी बोर्डावर येणे कठीण आहे. पण निर्णय लागेल तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच असं झालं तर शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल, शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील असा दावा वकील आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल असं ही ते म्हणाले.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 - 26 या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान सोनालीने जिल्ह्यातील जयनगर, बामखेडा आणि श्रीरामपूर या ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
डोंबिवली मानपाडा परिसरातील माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाने अचानक रस्ता बंद केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सुमारे ११५ कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता अनेक वर्षांपासून वापरात असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांसाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र जागा मालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.