Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रावर शक्ती चक्रवादळाचं सावट, कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Mumbai : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

पेट्रोल पंपावर एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. आगीच स्वरूप भीषण असलं तरी, यात कसलीही जीवितहानी झाली नाही. पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Mumbai: महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

महायुतीच्या तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित

आज जाहीर झालेल्या पॅकेजवर चर्चेची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही होणार खलबते

Pune: आधी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर "ताई" म्हणून तरुणाने मागितली माफी

नवरात्र उत्सव काळात पुण्यात भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

१ ऑक्टोबर रोजी पुणे सातारा रस्त्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका किरकोळ कारणातून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती.

Pune: गौतमी पाटीलने धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस

पुणे -

गौतमी पाटीलने धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस

८ दिवसानंतर सुद्धा गौतमी पाटीलने पोलिसांकडे जबाब नोंदवला नाही

१ तारखेला हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली असताना सुद्धा गौतमी पाटील उपस्थितीत नाही

पोलिसांचा आदेश झुगारुन गौतमी पाटील चे "शो" दणक्यात सुरू

Nashik : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

नाशिक -

- नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

- जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती

- तर कुंभमेळा आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती

- जलज शर्मा यांची महानगर आयुक्त म्हणून नाशिक महानगर विकास प्राधिकरणावर नियुक्ती

Ahilyanagar: जामखेड शहरात पाण्यावरून राजकारण तापले, रोहित पवरांचा राम शिंदेंवर आरोप

अहिल्यानगर -

जामखेड शहरात पाण्यावरून चांगले राजकारण तापले असून पाणी योजना कोणी आणली याचे श्रेय घेण्यासाठी सध्या मोठे राजकारण सुरू आहे त्यामध्येच जामखेड शहराला सात ते आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे मात्र श्रेय घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती आमदार राम शिंदे चुकीचे वक्तव्य करून प्रशासनाला चुकीच्या सूचना देऊन नागरिकांना पाण्या वाचून वेठीस धरत असल्याचा आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Dhule: आनंदाची शिधा योजना बंद करू नका, महिलांची सरकारकडे मागणी

आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर त्यामुळे गृहिणी नाराज

योजना बंद करू नये अशी गृहिणींची मागणी

धुळ्यातील गृहिणींनी राज्य सरकारकडे केली मागणी

Pune: पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरातील चौकात आंदोलन

न्यायपालिकेवर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Pune: पुण्यात ९ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी कर्मचारी गस्तीवर असताना महम्मदवाडी येथील महाराष्ट्र वनविभागच्या आनंदवन मध्ये मोकळ्या जागेत पाच इसम संशयितरित्या कोणाचीतरी वाट पाहत बसलेले दिसून आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांचे दिशेने पोलीस अधिकारी व स्टाफ जात असताना ते तेथुन पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी ४ व्यक्तींना पकडले

मतीन हुसेन मेमन, फैजल नैशाद मोमीन, फैयाज युसुफ शेख, सुरज राजेंद्र सरतापे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत

या चार ही जणांकडून ९ लाख ३७ हजार रुपयांचे ३५ ग्राम एम डी ड्रग्स आले मिळून तसेच ५ मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत

त्यांच्या विरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Ajit Pawar: संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश करणार

गेल्या अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असणारे विकास पासलकर शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार

गेल्या अनेक वर्ष संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून काम करणारे विकास पासलकर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहेत.

संभाजी ब्रिगेड सदस्य म्हणून काम करत राहणार

गेल्या अनेक वर्ष काम करत असताना कार्यकर्ते लोकांच्या भावना समजून आता राजकारणात प्रवेश करत आहे

शाहू फुले आंबेडकरांना मानणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना आहे.त्यामुळे त्यांच्यासोबत काम करत असताना आनंद होईल.गेल्या अनेक वर्ष मी शरद पवार यांच्यासोबत आहे त्यांना विचारूनच हा निर्णय घेतला आहे.त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही,मात्र आता पुढे जात असताना काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे त्यामुळे हा निर्णय घेत आहे.

Dhule: धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाची बॅटिंग सुरू

अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

आठवडाभरापूर्वी धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे झाले होते नुकसान

परंतु आता आठवडाभराच्या विश्रांतीनंतर धुळ्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

Nandurbar: अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी घेतला नंदुरबार नगरपरिषदेचा आढावा

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना नंदुरबार नगरपरिषदेच्या कामकाज बद्दल आढावा घेतले असताना धर्मपाल मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केली आहे, नंदुरबार नगरपालिकेवर मागील अडीच वर्षांपासून प्रशासक राज असल्यामुळे अनेक त्रुटी समोर आल्या आहेत तसेच पालिका प्रशासनाच्या वतीने आढावा बैठक साठी कुठलीही पूर्वतयारी केली नसून अनेक विभागात कामांसंदर्भात हलगर्जीपणा समोर आला आहे, यामुळे संबंधित मुख्याधिकारी यांना तीव्र शब्दात अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी तंबी केली आहे. पालिका हद्दीत येणाऱ्या नागरिकांना पालकाने सहकार्य करावे त्यांच्या अडचणी सोडवावे तसेच नियोजनबद्ध काम करावे असे आदेश मेश्राम यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे.

Mumbai: कृती संघटनेने राज्यभरात 13 तारखेपासून एसटी जाम करण्याचा आज इशारा

आणि दिवाळीच्या काळामध्ये राज्यातील एसटी आणि तो प्रवास पूर्ण बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

एसटी कर्मचारी कृती संघटनेच्या १५ ते३० कार्यकर्त्यांनी राज्यभरात 13 तारखेपासून एसटी जाम करण्याचा आज इशारा दिला आहे..आणि दिवाळीच्या काळामध्ये राज्यातील एसटी आणि तो प्रवास पूर्ण बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Dhule: धुळ्यात पोलिसांवर झालेल्या जमावाच्या हल्ल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करणारे 54 पैकी बारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आरोपींना घेण्यासाठी गेलेल्या पोलीसांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या 54 जणांविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

काल धुळे तालुक्यातील अजनाळे गावात आरोपी घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या व्हॅनवर जमावणे केला होता हल्ला

या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस कर्मचारी झाले होते जखमी, त्याचबरोबर पोलीस व्हॅनचे देखील झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान

दगडफेकीतील इतर आरोपी देखील निष्पन्न झाले असून त्यांना देखील ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके रवाना...

Bacchu Kadu: राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांचा रास्ता रोको आंदोलन सुरू

सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू समाधानी नाही

अमरावतीच्या तिवसा येथे बच्चू कडू यांचे नेतृत्वात अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू

राज्य सरकारच्या निषेधार्थ हजारो शेतकरी तिवसा शहरामध्ये रस्त्यावर

संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ही बच्चू कडू यांची मागणी

राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांच्या घोषणाबाजी

Vani: खासदार संजय देशमुख, संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणीत मोर्चा

खासदार संजय देशमुख,आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणीत मोर्चा,विश्रामगृहातून वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाणार मोर्चा

काल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या ताफा अडविल्या प्रकरणी वणी पोलीसांनी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह 13 पदाधिकाऱ्यांवर राईटचे गुन्हे दाखल करून अटक केलीये

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्री उईके यांचा ताफा अडवून ओला दृष्काळ आणि हेक्टरी 50 हजार रूपये शेतकऱ्यांना द्या अशी मागणी ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली होती

कालच ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन रात्री उशीरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याने रात्री मोठा जमाव पोलीस स्टेशनवर धडकला

यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि वणीचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात हजारो शिवसैनिकांच्या घेणार वणीचे उपविभागीय अधिकारी यांची भेट

Parbhani: परभणीत बंजारा समाजाचा विराट मोर्चा

बाजाराला समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून st मधून आरक्षण द्या या मागणी करता आज बाजाराला सभाजचा विराट मोर्चा काढण्यात आला आहे लाखोच्या संख्येने बंजारा समाज ह्या मोर्च्यात सहभागी झाले आहेत परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ मधून हा विराट मोर्चा काढण्यात आला आहे ह्याच मोर्चाचे ड्रोन ने काढलेले विराट मोर्चे चे विडीओ

४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला

शळा, कॉलेजच्या परीक्षाशुल्क माफ

हंगामी बागायतदाराला हेक्टरी २७ हजारांची मदत

३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

पीएम आवास योजनेतून घरे देणार

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिवाळीआधीच मदत मिळणार-एकनाथ शिंदे

विरोधक यांच्याकडून पॅकेज जाहीर करण्यासाठी

शेतकऱ्यांचा मागे उभे राहील पाहिजे हा निर्यन घेण्यात आला

ही दिवाळी काळी होणार नाही असे आम्ही बोललो होते

दिवाळी अगोदर मदत मिळणार आहे

काही लोक बोलत होते पंजाब तामिळनाडू सारखी मदत करण्यात यावी असे बोलत होते

मात्र कर्नाटक पेक्षा जास्त मदत करण्यात आली आहे

पीक विमा देखील मदत मिळणार आहे

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार आहे

केद्र सरकार कडून मदत मिळावी यासाठी देखील आम्ही पत्र देणार आहे

जेवढ्या जनावरांचा मृत्यू तेवढ्यांना नुकसान भरपाई- सरकारची मोठी घोषणा

जेवढ्या जनावरांचा मृत्यू तेवढ्यांना मदत

हंगामी बागायतदाराला २७ हजार हेक्टरी मदत

पीक निकसानीसाठी प्रति हेक्टर १८५०० रुपयांची मदत

Maharashtra Live News Update : विमा असलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना 17 हजार हेक्टरी मदत

Maharashtra Live News Update : सरकारकडून तब्बल ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद करण्यात आली आहे. डोंगरी भागातील घरांना दहा हजार अधिकची मदत देण्यात येणार आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला मदतीची तरतूद करण्यात आली. NDRF चे निकष काही प्रमाणात काढून टाकले आहेत. 47 हजार हेक्टरी खरवडून गेलेल्या जमिनींना मदत मिळणार आहे. प्रति विहीर 30 हजार रुपये देण्यात येणार आहे. पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ३२ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

रब्बीचे पिक घेण्यासाठी प्रति हेक्टर १० हजार रूपये अतिरिक्त देणार - फडणवीस

शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत

आपला शेतकरी पुन्हा पायावर उभा राहिला पाहिजे. शेती भविष्यात पुन्हा उभी राहिली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खास पॅकेज तयार केले आहे. राज्यात एक कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर पिकाची लागवड झाली होती. त्यापैकी ६९ लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले. २९ जिल्ह्यात जास्त नुकसान झालेय. २५३ तालुके मदतीसाठी सरसकट घेतले आहे.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी मदत

पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेती, पिके, घरांचे नुकसान झाले. काही लोकांचा मृत्यू झाला. आपल्याला भीषण चित्र पाहायला मिळाले. आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला. तातडीची मदत म्हणून घरामध्ये पाणी शिरले म्हणून १० हजार देण्याचा विषय, गहू-तांदूळ देण्याचा विषय असेल.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी मदत

आपण सर्व प्रकारची मदत करतोय.. नव्या घरे बांधण्यासाठी मदत करणार आहोत. त्याला पूर्ण पैसे देऊन घराची निर्मिती करणार आहोत. डोंगरी भागातील घराला १० हजार जास्तची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक जनावरसाठीही मदत केली जाणार आहे.

नाशिकच्या शेतकऱ्यांनी १४ वर्षात भरला २१८ कोटी रुपयांचा कर

- शेतकऱ्यांची कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकच्या सह्याद्री फार्म्सने १४ वर्षात भरला २१८ कोटींचा कर

- एकीकडे अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा हवालदिल झालेला असतानाच दुसरीकडे नाशिकच्या शेतकऱ्यांनी भरला कोट्यावधी रुपयांचा कर

- सह्याद्री फार्मसी या वर्षभरात १९५५ कोटींची उलाढाल

- त्यापैकी १०० कोटींचा नफा कमावत यंदा भरला ५४ कोटींचा कर

- एकीकडे राज्यातील बळीराजा सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला असतानाच नाशिकच्या शेतकऱ्यांनी १०० कोटींचा नफा कमावत आणि कोट्यवधींचा कर भरून आदर्श निर्माण केलाय

- सह्याद्री फार्म्स ही कंपनी देशासह जगभरात द्राक्षासह अन्य शेतमालाची करते निर्यात

- याच माध्यमातून सह्याद्री फार्म्सनी केली कोट्यावधींची उलाढाल

मनमाड नगराध्यक्ष पद सर्वसाधारण थेट नगराध्यक्ष पदासाठी राजकीय चुरस वाढली

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका असलेल्या मनमाड नगर पालिकेच्या थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण जाहीर झाल्या नंतर राजकीय पक्षां मध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.येत्या जानेवारी दरम्यान होत असलेल्या नगर पालिका निवडणूकी साठी मनमाड नगर पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाची लॉटरी निघाल्या नंतर अनेक राजकीय पक्षांचे ईच्छुक सक्रीय झाले आहे.त्यामुळे शिवसेना ठाकरेगट,शिंदेगट,आरपीआय,बहूजन वंचित आघाडी,भाजपा याच बरोबर अन्य राजकीय पक्ष व ईच्छूक उमेदवार सक्रीय झाले आहे.मागिल वेळी थेट नगराध्यपदी शिवसेना(ठाकरे गट) च्या पदमावती धात्रक या निवडूण आल्या होत्या मात्र शिवसेनेचे दोन गट पडले त्यात धात्रक यांचे सुपुत्र गणेश धात्रक हे विधान सभेच्या निवडणूकी नंतर भाजपात गेल्याने यंदा मनमाड नगर पालिकेच्या थेट निवडणूकीत कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोंबिवली सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर!

- कल्याण-डोंबिवली महापालिकेचे (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा त्यांच्या गलथान कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. डोंबिवलीमध्ये साप चावल्याच्या दुर्दैवी घटनेत साडेचार वर्षांच्या प्राणवीसह तिची मावशी श्रुती ठाकूर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयात योग्य उपचार आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलीचा जीव गेला, असा गंभीर आणि संतापजनक आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

नागपुरात  13 मुलांचा मृत्यू

कफ सिरपमुळे आतापर्यंत नागपुरात विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले एकूण 13 मुलांचा मृत्यू झाला.- नागपूर महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांची माहिती

Maharashtra Live News Update : राज्य सरकारला दिलासा मिळाला. मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

राज्य सरकारला मोठा दिलासा

मुख्य न्या श्री चंद्रशेखर आणि न्या गौतम अंखड यांच्या खंडपीठाचा निर्वाळा

हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयास दाखल करण्यात आल्या होत्या याचिका

कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.

२ सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची आहे याचिकाकर्त्यांची मागणी 

Pune : पुण्यात गौतमी पाटील विरोधात आंदोलन

पुण्यामध्ये गौतमी पाटील हिच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. गनिमी कावा संघटनेच्या तर्फे गौतमी पाटीलच्या विरोधात आंदोलन केले जातेय. गौतमी पाटीलच्या गाडीने 30 तारखेला अपघात झाला होता, त्यात रिक्षा चालक जखमी झाला.

यात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा खर्चही गौतमी पाटील हिने उचलला नाही, त्यामुळे गनिमी कावा संघटनेतर्फे गौतमी पाटीलचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू आहे.

Pune : पुण्यात भोरमध्ये जांभळीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

भोर तालुक्यातील जांभळी गावात मध्यरात्री भीषण प्रकार घडला आहे. गावातील सुरेश सोनवणे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ स्पष्टपणे कैद झाला असून, बिबट्याने एका कुत्र्याचा सुपडा साफ केल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री अडीच वाजता, म्हणजेच साधारण १ ते २:३० च्या सुमारास घडली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. बिबट्या गावाच्या हद्दीत मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MUMBAI | मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात हायकोर्टात सुनावणीला सुरूवात

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात हायकोर्टात सुनावणीला सुरवात

हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू

 मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू 

 कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. 

२ सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची तसेच शासन निर्णयात सुधार करण्याची आहे याचिककर्त्यांची मागणी आहे

सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा धाराशिवमध्ये निषेध

सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिव मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजीक संघटनांच्या प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला.खिशाला काळी फित लावुन कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर हल्लेखोंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

राजकारण करण्यासाठी मला मारहाण,   हा सर्व स्टंट आहे - बापूसाहेब पठारे यांचे स्पष्टीकरण

माझ्यावर हल्ला करणाऱ्यांनी राजकीय स्टंट केलेला आहे निवडणूक त्यांना लढवायचे आहे असा आरोप आमदार बापूसाहेब पठारे यांनी खांदवे यांच्यावर केला आहे.

आमदार बापू पठारे यांना सार्वजनिक कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळानंतर, त्यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाण प्रकरणी बंडू खांदवे याच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले..याप्रकरणी शकील अजमोद्दीन शोख (वय ४६, रा. तुकारामनगर, खराडी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू शहाजी खांदवे (रा. लोहगाव), शेखर मोझे, विलास खांदवे, कालिदास खांदवे, गणेश खांदवे, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे, रामेश्वर पोळ, सागर करजे, ओंकार ऊर्फ ओम्या खांदवे, हरिदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे आणि अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राजकीय स्टंट केला जात आहे. आम्ही हे आंदोलन करणार होतो त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्याच आंदोलनाचे प्रश्न आमचे प्रश्न एक होते. एकत्र बसून आंदोलन करू असं सांगण्यात आलं मात्र त्यांनी ते ऐकलं नाही. त्यांना कोण पाठीशी घालते हे सर्व जनतेला माहित आहे असं म्हणत बापूसाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सावंतवाडी-वेत्ये येथे मगर आली चक्क घरापर्यंत

सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथे नागरी वस्तीत रात्रीच्यावेळी मगर आढळून आली आहे. वेत्ये परिसरात असणाऱ्या तेरेखोल नदीच्या पात्रातून ही मगर नागरी वस्तीच्या ठिकाणी आल्याची शक्यता आहे. ही मगर वेत्ये येथील रहिवासी बाबुराव तेंडोलकर यांच्या घरापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाकड मध्ये गावगुंडांच्या टोळक्याने केली एका तरुणाला बेदम मारहाण , सोशल मीडियावर मारहाणीचा विडियो व्हायरल

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड उडान पुलाजवळ गावगुंडांच्या एका टोळक्याने एका तरुणाला शिवीगाळ करत लाथा भुक्क्याने तसेच दगडाने बेदम मारहाण केली आहे. गावगुंड मारहाण करत असतानाचा विडियो सोशल मीडियावर सध्या वायरल झाला आहे. वाकड पुला जवळील पान टपरी चालक आणि ऑटो रिक्षा चालक यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ वादावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आता या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन वाकड पोलीस गाव गुंडांच्या टोळक्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणार आहेत.

संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसकडून रॅली वर्षभर असणार

संघाला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत मात्र संघ परिवाराचा प्रचार विषारी आहे तसेच संघ हा विसर्जित करावा या निमित्ताने आमची मागणी आहे

मनसे ऑन

सन 2019 मध्ये महाविकास आघाडी झाली तसेच भाजप लोकशाही धोक्यात आणत आहेत सर्वांना संपत आहे तसेच याबाबत महाविकास आघाडीची कन्वयंशी संपर्क साधावा तसेच राज्यात नव्या भिडू गरज नाही याबाबत आम्ही कोणतीही प्रकारची तरजोड केली जाणार नाही

स्थानिक पातळीवर युती करण्याच्या बाबत स्थानिक पातळीतील नेत्यांना अधिकार देण्यात आले आहे

यवत आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी बातचीत केले

स्वस्त रेशन दुकानावर गहू ऐवजी मिळतेय ज्वारी

एकीकडे यंदा दिवाळीसाठी सरकार कडून आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. तर दुसरीकडे मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्वस्त रेशन दुकानावर गहू ऐवजी ज्वारी दिली जातय, शिवाय तांदूळ देखील निष्कृष्ठ दर्जाचा असल्यामुळे दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकासह गोरगरिबांना पडला असून दिवाळीला गोडधोड केले जाते त्यासाठी गहू आणि चांगला तांदूळ लागतो मात्र रेशनवर ज्वारी देण्यात आल्यामुळे पोळी ऐवजी भाकरीवर दिवाळी साजरी करण्याची वेळ सर्वासामान्य नागरिकांवर आली असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Live News Update : सांगलीत एका नवविवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येते सासूच्या औषध उपचारासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहिता अमृता गुरव हिचा छळ सुरू होता.. या छळाला कंटाळून तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटने प्रकरणी इश्वरपूर येथे पती ऋषिकेश, सासू सासरे, व ननंद यांच्यावर इश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक वर्षापूर्वी घरच्यांचा विरोध डावलून अमृताने ऋषभ सोबत प्रेमविवाह केला होता.

टोल नाक्यावर साहित्याची तोडफोड 1 लाख 15 हजाराचे नुकसान केल्याची तक्रार

नांदेड ते नागपूर रोडवरील पारडी इथ टोल नाका चालवायचा असेल तर 50 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या विरुद्ध अर्धापूर पोलिस स्थानकांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शशी पाटील असे खंडणी मागणाऱ्या इसमाचे नाव आहे. खंडणी दिली तर टोल चालू देणार नाही असे म्हणत काल मध्यरात्री त्याने टोल बूथचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे साहित्याची तोडफोड केली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अर्धापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष असल्याची माहिती आहे

सावंतवाडी नगराध्यक्षपदावर केसरकर यांचा ठाम दावा.

नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर झाल्या नंतर सावंतवाडीत महायुतीत रंगत वाढताना दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर ठाम दावा केला असून, आमचा नगराध्यक्ष असावा अशी भूमिका माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केली आहे. शिवसेनेत अनेक सक्षम चेहरे असून गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहराचा पाठिंबा आम्हाला लाभला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद महायुतीतून शिवसेनेकडेच सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी महायुतीच्या बैठकीत आपण करणार असल्याची माहीती केसरकर यांनी दिली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत सावंतवाडी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महीला प्रवर्गासाठी आरक्षित झाल आहे. त्यामुळे केसरकर यांनी नगराध्यक्ष पदावर दावाकरून महायुतीत सावंतवाडीचा नगराध्यक्ष हा शिंदेच्या शिवसेनेचाच होईल असा प्रयत्न सुरू केला आहे.

खासदार श्रीकांत शिंदेंकडून अंबरनाथच्या २९ पॅनेलचा आढावा

अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी अंबरनाथमधील सर्व २९ पॅनेल मधील इच्छुकांशी संवाद साधला. अंबरनाथ शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी शिंदे अंबरनाथमध्ये आले होते.

यानंतर अंबरनाथच्या ग्लोब हॉलमध्ये शिंदे यांनी सर्व २९ पॅनेल मधील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्याशी प्रभाग निहाय संवाद साधला. यावेळी प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती, प्रभागात आजवर झालेली कामं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं मतदान आणि पक्षांतर्गत वातावरण याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते. दरम्यान शिंदे यांनी सर्व २९ प्रभागांमधील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यामुळे आता शिवसेना अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करतेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माढ्यात शिवसेनेकडून पूरग्रस्तांना कपड्यांचे वाटप

माढा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना धावून आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी माढा तालुक्यातील सुमारे 5000 पूरग्रस्तांना दैनंदिन कपड्यांचे वाटप केले.

शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाकडे ही मदत देण्यात आली यामध्ये ब्लॅंकेट टॉवेल व इतर कपड्यांच्या समावेश आहे याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

YAVATMAL - यवतमाळ प्रथमच होणार एसटी प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष

यवतमाळ नगर परिषदेची धुरा प्रथम एसटी प्रवर्गातील महिलांच्या हाती जाणार आहे. या पदावर प्रभावी महिला उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांचा कल लागणार आहे. शहरात भाजपची कायम एक हाती सत्ता राहिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. काँग्रेसकडून नगरपरिषदेतील फार पूर्वीचे वैभव परत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपला विधानसभेचा वाचपा काढायचा आहे.

- मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिले जलसंपदा आणि नंतर कृषी विभागाचे नुकसान भरपाई यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होत आहे. नुकसान भरपाई चे 80 टक्के आकडे आले आहेत, दहा-वीस टक्के आकडे बाकी आहेत
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

आज सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात होणार आहे.

PUNE - गुंड निलेश गावाला परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न

निलेश घायवळ चा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

घायवळकडे पुणे पोलिसांचे दुर्लक्ष नडले

खंडणी प्रकरणात 2021 मध्ये न्यायालयाने जमीन देताना निलेश घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याने पासपोर्ट जमा केला नव्हता त्याच वेळी पुणे पोलिसांनी त्याच्याकडील पासपोर्ट बाबत चौकशी केली असती तर घायवळ नावाचा आणि बेकायदेशीरपणे मिळवलेल्या पासपोर्टचा विषय समोर आला असता

तत्कालीन पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष नडले अशी चर्चा आता पोलीस दलात सुरू आहे

पाण्यातून सोयाबीन काढण्याची शेतकऱ्यांची कसरत

पावसाने उभे पीक पाण्याखाली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये अक्षरशः तळे असाव असं पाणी आहे. गुडघाभर पाण्यातून शेतकरी कसरत करत सोयाबीनची काढणी करत आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील हे चित्र आहे. गुडघाभर पाण्यात बाजेचा वापर करत सोयाबीन काढले जाते. अगोदरच पावसानं मोठ नुकसान झालंय. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. काहीतरी पदरात पडावे यासाठी संकटाशी शेतकऱ्यांचा सामना सुरू आहे.

पुरंदर विमानतळासाठी तीन गावातील मोजणी पूर्ण

मुंजवडी उदाची वाडी आणि एकतपुर येथे झाली आहे

807 एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे

येत्या शनिवारपासून कुंभारवळ, खानावळ या दोन गावातील मोजणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमती पत्रे दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवसात 50 हेक्टर जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती

पुरंदर विमानतळासाठी एकूण तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे…

- विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये आणखी एका बाळाचा मृत्यू

- धानी डेहरिया या 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

- नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान धानीचा मृत्यू

- मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून धानी ला नागपुरात उपचारासाठी गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते

- किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने धानी वर मेडिकल मध्ये उपचार सुरू होते

- धानी डेहरियाच्या मृत्यूनंतर कफ सिरप मुळे एकूण मृत्यूसंख्या पोहचली दहा वर

वलगाव पोलीस ठाणे हद्दीत थुगाव येथे नालीत नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला; गावात खळबळ

अमरावती जिल्ह्यातील थुगाव येथे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास नालीत नवजात पुरुष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. गावातील दोन युवकांना नालीत कुत्रे मृत अर्भक ओढत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटीलांना कळवले व वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.

अर्भकाचे शरीर तुकडे झालेले असून त्याच्या हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असून, अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे. अर्भकाच्या जन्मदात्या आई-वडिलांचा शोध सुरू असून पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत.

भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग; संपूर्ण गोदाम जळून खाक

भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरातील याह कंपाऊंड येथे पहाटेच्या सुमारास भंगार गोदामाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण भंगार साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गोदामातील सर्व भंगार साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पोलिसांनी आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना,पोर्णिमा उत्सवाला सुरूवात

:महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची सिमोल्लंघनंतरची पाच दिवसाची श्रम निद्रा संपवुन देवी आज पहाटे सिंहासनावर विराजमान झाली आहे.पहाटे 1 वाजता तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा करुन पुजारी,महंत व मंदीर संस्थानचे अधिकारी यांच्या उपस्थितीत देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली पोर्णिमेनिमित्त तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.अश्विन पोर्णिमेचा वर्षाचा पारंपरिक खेटा पुर्ण करण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येत असतात.पोर्णिमेसाठी राज्यासह,आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

२० जणांवर गुन्हा दाखल

आमदार बापू पठारे यांना सार्वजनिक कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळानंतर, त्यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाणप्रकरणी बंडू खांदवे याच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले...

याप्रकरणी शकील अजमोद्दीन शोख (वय ४६, रा. तुकारामनगर, खराडी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू शहाजी खांदवे (रा. लोहगाव), शेखर मोझे, विलास खांदवे, कालिदास खांदवे, गणेश खांदवे, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे, रामेश्वर पोळ, सागर करजे, ओंकार ऊर्फ ओम्या खांदवे, हरिदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे आणि अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

यवतमाळ प्रथमच होणार एसटी प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष

यवतमाळ नगर परिषदेची धुरा प्रथम एसटी प्रवर्गातील महिलांच्या हाती जाणार आहे. या पदावर प्रभावी महिला उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांचा कल लागणार आहे. शहरात भाजपची कायम एक हाती सत्ता राहिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. काँग्रेसकडून नगरपरिषदेतील फार पूर्वीचे वैभव परत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपला विधानसभेचा वाचपा काढायचा आहे.

छिंदवाडा परिसरातील ३६ रुग्ण नागपुरात दाखल

- छिंदवाडा परिसरातील ३६ रुग्ण नागपुरात दाखल, आतापर्यंत १० मृत्यू; डेथ ऑडिटनंतर कारण स्पष्ट होणार, NIV चे रिपार्ट ठरणार महत्वाचे

- ० ते १६ वर्षे वयोगटातील १२ रुग्ण सध्या उपचार सुरू, मध्यप्रदेश १०, महाराष्ट्र १, तेलंगणा १.

- वैद्यकीय शिक्षण विभागाचे ३ सदस्यीय पथक तपासणीस सुरुवात,

- ६ रुग्ण व्हेंटिलेटरवर, त्यापैकी मेडिकलमध्ये ४, इतर रुग्णालयात २.

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक मंगळवारी नागपुरात, पुढे छिंदवाड्यालाही भेटीची शक्यता.

- महापालिकेच्या अहवालानुसार संशयित मेंदूज्वराचे १२ रुग्ण उपचाराधीन — मेडिकल ६, एम्स २, लता मंगेशकर १, तीन खासगी रुग्णालयात प्रत्येकी १.

- तपास पथकात डॉ. आरती किन्हिकर, डॉ. छाया वळवी आणि डॉ. भालचंद्र चिकलकर, मुंबई, पुणे येथील तज्ञांचा यांचा समावेश.

- पथकाने रुग्ण व नातेवाइकांची भेट घेऊन केसपेपर तपासले, उपचाराची दिशा ठरवली

विमानतळ उद्घाटना दिवशी नवी मुंबईत जड आणि अवजड वाहणांना पुर्ण बंदी.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ ॲाक्टौंबर रोजी होणार असल्याने त्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १० वाजे पर्यंत शहरातून जाण्यास जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पार्किंग सुद्धा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मध्ये ट्रक , कंटेनर , टॅंकर आदींचा समावेश आहे. उध्दघाटनंतर मोदी यांची सभा होणार असल्याने जवळपास ५० हजार लोकं उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर राज्याचे संपुर्ण मंत्रिमंडळ, अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

बनावट कागदपत्र सादर करून पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा दाखल

पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

बनावट कागदपत्र आणि प्रतिज्ञा पत्र सादर करत मिळवला पासपोर्ट

आपल्यावर कुठला ही गुन्हा दाखल नसल्याचं सांगत केली शासकीय यंत्रणांची फसवणूक

बनावट ओळखपत्र आणि कागदपत्र पोलिस आणि पासपोर्ट कार्यालयाला सादर करत मिळवला पासपोर्ट

फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करून पासपोर्ट ॲक्ट १९६७ आणि आधार ॲक्ट २०१६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

महायुतीत प्रथम निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी दिला जाणार असल्याची सुत्रांची माहीती

विकास कामांसाठी दिल्या जाणार्या नीधीबाबत अजित पवार यांची भूमिका ऊदासिन असल्याची आमदारांची शिंदेंकडे तक्रार

याबाबत तीन्ही प्रमुख नेत्यांनी योग्य तो मार्ग काढावा अशीही आमदारांची भूमिका.

AMARAVATI - सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नाचा काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नाचा काँग्रेस नेत्या माजी मंत्री  यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध.

भूषण गवई हे बुद्धिस्ट मागासवर्गीय  समाजामधून येतात आणि संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे म्हणून ते या ठिकाणी बसले आहे  हे सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही ही वास्तविकता आहे - यशोमती ठाकूर यांची टीका 

2014 पासुन भाजपची सत्ता आली तेव्हापासून आदिवासी,अल्पसंख्यांक, मागासवर्गीयावर अन्याय होत आहे

वणी पोलीस ठाण्यात समोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची गर्दी

तद्नंतर पोलिसांनी शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.उशिरा पर्यंत जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना न सोडल्याने हजारो शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली

,दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या सह काही पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवला होता.मंत्री उईके हे वणीत आढावा बैठकीसाठी गेले होते.मात्र आढावा बैठक न घेताच मंत्री उईके यवतमाळकडे निघाल 

वणी पोलीस स्टेशन समोर अजूनही शिवसैनिकांची गर्दी कायम, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कडून कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठानकडून आल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

SCROLL FOR NEXT