पेट्रोल आणि डिझेलचे भाव अचानकपणे वाढले असून आज अहिल्यानगर शहरात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद असल्याचं चित्र पाहायला मिळते याचा परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांवर होत असून मे महिन्याचा शेवटचा आठवडा तो असल्यामुळे शेतीचे कामे आता सुरू झाली आहेत शेती करण्यासाठी बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी येत आहेत मात्र गेल्या तीन दिवसांपासून डिझेल मिळत नसल्याने शेतीचे कामे खोळंबली असल्याचे प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे
देऊळगावराजा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी व वाहनधारकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेती मशागतीच्या कामांसाठी डिझेल आवश्यक असल्याने शेतकरी कॅन घेऊन तब्बल 12 तासांपासून रांगेत उभे असल्याची चित्र दिसत आहे .. डिझेल टंचाईमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला असून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या जवळपास एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे....
अशोक खरातचा ईडीने घेतला ताबा
ईडीचे अधिकारी खरातला घेऊन मुंबईच्या दिशेने झाले रवाना
विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच नांदेड मध्ये राजकीय घडामोडी सूरू झाल्या.स्थानिक स्वराज्य संस्थेची नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्याकडे आपण तशी मागणी केल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले.तिन्ही पक्षाचे नेते बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील. तो निर्णय मान्य असेल. मात्र राष्ट्रवादीची ताकद देखील जिल्हयात आहे.आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे असं चिखलीकर म्हणाले.नांदेड जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक भाजपाचे सदस्य आहेत.त्यामूळे या जागेवर भाजपचा दावा आहे.मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडन्याची मागणी चीखलीकर यांनी केल्याने युतीत धुसपुस होण्याची शक्यता आहे.
नांदेडच्या कदम कुटुंबाची आज पुन्हा पुण्यात सीबीआय कडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे.शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युत नगर भागात धाड टाकून कदम कुटूंबाची आठ तास चौकशी केली होती.कदम यांनी आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपयात नीट चा पेपर विकत घेतला होता असं सीबीआयच्या तपासात उघड झाल्याची माहिती आहे.कदम कुटुंबीय पुण्यातील एका एका एजंटच्या संपर्कात होते.तिथूनच त्यांनी व्यवहार केल्याचा ठपका आहे.शनिवारी सीबीआयच्या पथकाने कदम कुटुंबांच्या प्रत्येक सदस्याची कसून चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना पुणे येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलण्यात आल्याची माहिती आहे.आज अकरा वाजता कदम कुटुंबीय पुणे येथील सीबीआय कार्यालयात हजर होणार आहेत.दरम्यान सीबीआयने चौकशी केलेल्या कदम कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आपले फोन स्विच ऑफ केल्याची माहिती आहे
नाशिकच्या मालेगाव पोलिस अँक्शन मोडवर आले आहे.नव्याने रुजू झालेले अप्पर पोलिस अधिक्षक सूरज गुंजाळ यांनी आर.टी.ओ.अधिका-यांना सोबत घेत शहरातील मुख्य गजबजलेल्या चौकां मध्ये पोलिस अधिकारी-कर्मचा-यांना सोबत घेत दंडात्मक कारवाईला सुरुवात केलीय.कागदपत्रे नसणे,नंबरपेल्ट नसणे,ट्रीपल शिट,लायसन नसणे अशा वाहन धारकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केल्याने वाहनधारकां मध्ये चांगलीच दहशत पसली आहे,बेशिस्त वाहतूक,वाहतूकीची कोंडी यामुळे रस्त्याने चालणा-या पायी जाणा-या नागरीकांचे अपघात होऊ नये म्हणून ही धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
अकोला, अमरावती , यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी नागपूर वेध शाळेकडून उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट...
यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी बाहेर पडतांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
आज विदर्भात बहुतांश जिल्ह्यत तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता
सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते दोराबजी मॉल समोरील पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झालं.
याच टाक्यांचं लोकार्पण मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात केलं होतं. शिवसेनेला विश्वासात न घेतल्यामुळे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी पुन्हा या टाक्यांचं लोकार्पण नागरिकांच्या हस्ते केलं आहे. या टाक्यांसाठी पाठपुरावा भानगिरे अनेक वर्ष करत होते. पाण्यांच्या टाक्यावरून श्रीवादाची लढाई पुण्यात शिवसेना-भाजप मध्ये पाहायला मिळत आहे.
दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका डिजिटल तपासल्या जाणार पुरवणी परीक्षेसाठी बोर्डाचा निर्णय
दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात येत आहे
एका विषयाच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने केंद्रावर दिल्या जाणार आहेत आणि उत्तर पत्रिका डिजिटल पद्धतीने तपासल्या जाणार आहेत
या प्रयोगाच्या परिणाम पाहून येत्या वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षेत त्याचा वापर करण्यात येणार आहे
पुण्यातील पाटील इस्टेट परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरात ८ ते १० पोरांच्या टोळक्याने प्रचंड राडा घालत गाड्यांची तोडफोड केली आणि परिसरात दहशत माजवली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या पोरांची पाटील इस्टेट परिसरात मोठी दहशत असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.