वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून वर्धेच कालच तापमान 46.5 अंश सेल्सिअस होते. सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शीतकक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे उष्णतेचा फटका बसलेल्या रुग्णांना तातडीने उपचार देणे शक्य होणार आहे.
बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींमधील 31 रिक्त जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यामध्ये 12 सरपंच आणि 19 सदस्य पदांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेला 7.30 सुरुवात झाली असून 59 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. तसेच केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत.. तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील स्वरूपानंद देशमुख हे स्पर्ती स्पर्धेत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत.. गेल्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा अवघ्या नऊ मताने पराभव झाला होता.
चाकण परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून २० लाख रुपयांच्या अॅल्युमिनियम प्लेट चोरी प्रकरणात चाकण उत्तर पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली असून ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार आहेत.राक्षेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या २१० घरांच्या साईटवरून अॅल्युमिनियम प्लेट चोरी झाली होती. चोरीचा माल कात्रज, चाकण आणि शिक्रापूर येथील भंगार मार्केटमध्ये विक्रीस नेल्याचे उघड झाले. पोलिसांनी सात जणांना अटक करून ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसीची मुदत जून २०२६पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी एप्रिल-मे वेतन रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. परीक्षांचे काम व प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे अडचणी येत असल्याने निर्णय घेण्यात आला. मात्र, ही अंतिम मुदत असून त्यानंतर कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारचा दिवस अपघातांचे भीषण सत्र घेऊन आला. वैजापूर, करमाड आणि बिडकीन परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहिली घटना वैजापूरच्या बाभूळगाव येथील सलमान शेख (३३) यांच्याबाबत घडली; नांदगावजवळ कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, करमाड येथील लहुकी फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जगन्नाथ दांडगे (३६) या दुचाकीस्वाराचा अंत झाला. तिसरी दुर्घटना बिडकीन-पैठण महामार्गावर घडली, जिथे भरधाव रिक्षा उलटून छाया कोथिंबिरे या महिलेचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनांत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, एकाच दिवशी झालेल्या या मृत्यूंच्या तांडवामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर करणार होते आंदोलन.
शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वितरकाला आमदार संजय गायकवाड यांनी केली होती शिवीगाळ त्याचा निषेध म्हणून आज बुलढाण्यात आमदार रोहित पवार हे संजय गायकवाड यांच्या घरासमोर करणार होते आंदोलन.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा आज मोर्चा
शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अर्वाची शिवीगाळ करत दिली होती धमकी
करमाळ्याचा भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याने घोटी गावातील शासकीय पाझर तलावाच्या 17 एकर जमिनीमध्ये अतिक्रमण करून सहा एकर जमिनीवर कब्जा मिळवला आहे. या अतिक्रमण केलेल्या जमिनीमध्ये फार्महाऊस ,जनावरांचा गोठा, नारळाची बाग आणि भलीमोठी विहीर खोदली आहे. यात आणखी कहर म्हणजे पाझर तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा करून तो स्वतःच्या शेततळ्यात साठवतो अशी माहिती स्थानिक शेतकर्यांनी दिली आहे.
राज्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नव्याने सूचना आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केल
त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये पूर्ण करावी लागणार
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून बुलढाण्यात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पुस्तकाचे शीर्षक बदलावे, अन्यथा त्यावर बंदी आणावी, अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी केली आहे.
उद्याच्या रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चाचे स्वागत असल्याचे सांगत, मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज असा सन्मानपूर्वक उल्लेख करूनच पुस्तकाचे वाचन करावे, अशी अटही त्यांनी घातली आहे. दरम्यान, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोर्चात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती मिळत असल्याचा दावा करत, जर आमदार गायकवाड यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य झाले तर त्याला मोर्च्यातच जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही राजपूत यांनी दिला आहे
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सविस्तर आढावा घेतला.वन विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक आणि अधिकारी वर्ग उपस्थितीत होते.बैठकीदरम्यान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत शासकीय कामे वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करणे आवश्यक असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.