डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात करण्यात आलेल्या बॅनरबाजी नंतर डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट भाजप मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडी पुन्हा उघड झाल्या असून यानंतर डोंबिवली राजकारण चांगलंच तापलं आहे.बॅनर प्रकरणी पोलीस ठाण्यात दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना नोटीस बाजवली होती. याबाबत विचारपूस करण्यासाठी दीपेश म्हात्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकानी पोलीस स्टेशन बाहेर एकच गर्दी केली होती..
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आज मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राजेभाऊ फड हे परळीतील आहेत. तसेच रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत.. राजाभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत..
फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. अशातच त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होत असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजेभाऊ फड यांचे आव्हान असणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड - परळी महामार्गावरील तेलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केला जातोय. यावेळी मराठा समाजाकडून अनोखे आंदोलन करत लक्ष वेधण्यात आले. महामार्गावर श्वानांच्या गळ्यात छगन भुजबळ, नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्या नावाच्या पाट्या अडकवून आंदोलन केले जात आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. मध्यरात्री समाज बांधवांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन घेतली. मात्र प्रकृती खालावत असताना देखील राज्य सरकार या उपोषणाची गंभीर दखल घेत नसल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. बीड परळी महामार्गावर रास्ता रोको करत राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाची आज बैठक झाली त्यामध्ये उद्या पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. बंद शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशभरात रेल्वे रुळावर सिलिंडर, खांब, दगड ठेवून अपघात घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने चिंता व्यक्त होत असताना छत्रपती संभाजीनगरात अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडालीये.रेल्वे रुळावर सिमेंटचे ढापे,दगड ठेवलेले असले तरी सुदैवाने ताशी १०० किमीच्या वेगाने धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला.ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजता लाडगाव-करमाड शिवारात घडली.
नंदीग्राम एक्स्प्रेस रात्री छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे रवाना झाली. रेल्वे रात्री १ वाजता लाडगाव-करमाड शिवारातील उड्डाणपुलाखालून जातांना चालकाला रुळावर सिमेंटचे ढापे,सिमेंटचे दगड ठेवल्याचे दिसले. ताशी १०० किमीचा वेग असल्याने ब्रेक लागेपर्यंत रेल्वेने दगडांना उडविले. जोरदार आवाज झाल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. दगड ठेवलेल्या जागेपासून २०० मीटरवर जाऊन ही रेल्वे थांबली. धडकेमुळे रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला सिमेंटच्या दगडांचे तुकडे पडले होते. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन रेल्वे पुढे रवाना झाली.
मिरा भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई केली आहे.रुग्णांचा आवश्यक तपशील न ठेवल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत मिरा-भाईंदर मधील ९ सोनोग्राफी केंद्रांचे नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.यात बड्या रुग्णालयांसह सोनोग्राफी केंद्रांचा देखील समावेश आहे. मिरा-भाईंदर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.विशेष बाब म्हणजे शहरातील प्रसिद्ध रुग्णालय भक्ती वेदांतचा देखील समावेश आहे.
धुळे शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, रात्री जवळपास एक ते दीड तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आल्याचे बघायला मिळाले आहे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नागरिकांची व ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली, धुळे तालुक्यातील नगाव, धमाने, कापडने या परिसरामध्ये नागरिकांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले आहे, त्याचबरोबर रस्त्याला नदी नाल्याचे स्वरूप आल्याचे बघावयास मिळाले आहे,
राज्य महामार्ग महामंडळाच्या शिवाजीनगर आगारातून सुटणार बसेस
नवरात्र उत्सवात चार व सत ऑक्टोबरला दोन बसेस सोडण्यात येणार
भाविकांसाठी बस चे ऑनलाईन ॲडव्हान्स बुकिंग सुरू
साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी २६७५ रुपये इतके तिकीट
तुळजापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी गड अशा ३ ठिकाणी ही बस जाणार
भाविकांना राहण्याचा, जेवण, दर्शन पासचा खर्च स्वतःला करावा लागणार
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड मध्ये मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले.अर्धापूर ते परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला आहे.नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे हे आंदोलन सुरू आहे.मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची तब्बेयत खालावत चाली आहे.परंतु अद्याप सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाहीय.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अर्धापूर ते परभणी हा महामार्ग या मराठा आंदोलकांनी रोखून धरला आहे.या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पार्टीची ताकद वाढावी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून यावेत, यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
लातूर जिल्हा भरात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आहे. काल सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल आहे.. लातूरच्या मुरुड ,औसा ,लातूर शहर ,रेनापुर यासह इतर भागात देखील पावसाने प्रचंड मोठ नुकसान केल आहे.. तर लातूर शहरातल्या जलसिंचन भवन कार्यालयात पाणी शिरल्याने संपूर्ण कार्यालयात पाणी तुंबलं आहे.. दरम्यान पाण्यामुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र आणि जुनी रेकॉर्ड भिजली आहेत.
महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनीधींना जाणीवपूर्वक पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून व मंजूर कामांतून वगळण्यात आल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे,पुरंदर चे आमदार संजय जगताप आणि हवेलीच्या आमदार अशोकबापू पवार आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर
मुंबईत ऐकणार विविध संस्था-समाजघटकांची मतमतांतरे
वक्फ विधेयकावर संसदेची संयुक्त समिती गेले अनेक दिवस अभ्यास, चर्चा करत आहे
देशभरातून १.२ कोटींहून जास्त मत-मतांतरे समितीला प्राप्त झाली आहेत
धनगर आरक्षण आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आज विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सहा ही उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज नगरकडे रवाना झाले. छत्रपती संभाजी महाराज नगर येथील जातपडताळणी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिपक बोराडे,माऊली हळणवर, योगेश धरम आदी आंदोलनकर्ते रूग्णवाहिकेतूनच रवाना झाले.
अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये रस्त्यांवर तुंबले पाणी
- अवघ्या काही तासांच्या पावसाने शहरात वाहतूक देखील विस्कळीत..
- केंद्रीय गृहमंत्री शहरात येणार असताना देखील नियोजन ढासळले...
- द्वारका परिसरात पाणी साचले, तर मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी
- नियोजन शून्य कारभाराचा नाशिककरांना देखील फटका
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मंगळवारी जाऊन भेट घेतली. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास राजेश टोपे अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात गावगुंडांनी पंधरा-वीस वाहनांची केली तोडफोड केली आहे. तर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावगुंडाने चार-पाच वाहनांची केली तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बुलढाणा-नागपूर या महामार्गावरील रोहना गावाजवळील रोहना नदीला पूर आला असून 2 तासापासून वाहतूक खोळंबली आहे. या पावसाने तालुक्यातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
भंडारा जिल्ह्यात काही दिवसाआधी आलेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठावरील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात करपा हा रोग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धान पिकाला याचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात धान पीक देखील जमीन दोस्त झालेले आहेत. नदी काठावरील शेकडो एकर शेतशिवारात करपा लागल्याने अगदी कापणीवर आलेले धानपिक सुकत चाललेले आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव गेत दरड हटवण्याचे काम केले. रात्री १ वाजेनंतर वाहतूक पूर्वरत झाली.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरमधील 6 जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मोठ्या उत्साहात मतदान पार पडतंय. दुसऱ्या टप्प्यात 25.78 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांपैकी 15 जागा मध्य काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. औसा तालुक्यातील उजनी परिसराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी गावातल्या बाजार चौकात पाणी साचले आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.