मुलाला अधिकारी केले. मात्र आईचे निधन झाल्याने हळहळ 
महाराष्ट्र

मुलाला अधिकारी केलं; अन् आई थांबली नाही..

राज्य गुप्तवार्ता विभागात अधिकारी पदावर रुजू झालेले पाचपिंपळी येथील रहिवासी गणेश विठ्ठल वाघमारे

संतोष जोशी

नांदेड : आयुष्यभर शेती, कुटुंब सांभाळत, परिस्थितीशी चारी हात संघर्ष करत आपल्या एकुलत्या एक मुलाला अधिकारी बनविणाऱ्या आईने, सुखाचे चार दिवस न पाहताच बुधवारी (ता. सात जुलै) जगाचा निरोप घेतला, ही हृदयद्रावक घटना बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथे घडली.

राज्य गुप्तवार्ता विभागात अधिकारी पदावर रुजू झालेले पाचपिंपळी येथील रहिवासी गणेश विठ्ठल वाघमारे यांच्या मातोश्री राधाबाई विठ्ठलराव वाघमारे ( वय 65 ) यांचे दुर्धर आजाराने बुधवारी पाचपिंपळी येथील राहत्या घरी निधन झाले. गत महिन्याभरापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या.

आयुष्यभर कष्ट करत आपला मुलगा अधिकारी झालेला पाहण्याची जिद्द या आईने पूर्ण केली खरी पण मोठ्या संघर्षानंतर आलेले सुखाचे दिवस या मातेला नियतीने पाहू दिले नाही.

हेही वाचा - पावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक!

डॉक्टरांनी महिनाभर शर्थीचे प्रयत्न करुनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. राधाबाई वाघमारे यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पाचपिंपळी, कासराळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT