panchganga  
महाराष्ट्र

कोल्हापूरवासियांची चिंता वाढली; पंचगंगेचे पाणी पात्रा बाहेर

संभाजी थोरात

काेल्हापूर : गेल्या दाेन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे काेल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत माेठी वाढ झाली आहे. काेल्हापूर शहरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर आले आहे. पंचगंगा panchganga नदीची पाणी पातळी 28.50 इतकी झाली आहे. (kolhapur-heavy-rain-panchganga-river-water-level-increased-sml80)

हवामान खात्याने आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे काेल्हापूरवासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सततच्या पडणा-या पावसामुळे प्रशासनाने काेल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चंदगड, आजरा, गडिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा या तालुक्यांत सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडावे. नदी पात्रांची पाणी पातळी वाढू लागल्यास पूलावरुन, आेढ्यावरुन शक्यताे वाहतुक टाळावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT