Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : तीन शालेय मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याच्‍या खोलीचा अंदाज न आल्‍याने दोघांना पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. गावात ही बातमी कळल्‍यानंतर कुटूंबाने हंबरडा फोडला. (Jalgaon News Child Death)

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात असलेल्‍या तलावात निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७ ), सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५) व जय जालिंदर सोनवणे हे पोहण्यासाठी गेले होते. हे तिघे मित्र शिरसोली येथील भोलानाथ नगरातील रहिवाशी पोहत असताना निलेश व सुर्यवंशी हे तलावाच्‍या मधोमध गेले. यात ते बुडाल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला. तर या घटनेत नववीत शिक्षण घेणारा जय सोनवणे हा बचावला आहे. दोघा शाळकरी मुलांचे मृतदेह एमआयडीसीच्या समाधान टाकळे, शुद्धधन ढवळे दोन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने काढले असून या ठिकाणी पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी गर्दी केली होती. दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.

मृतदेह बाहेर काढताच कुटूंबाचा आक्रोश

घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी आणि पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल या तिघांनी त्या दोन मृत मुलांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी घटनास्थळी दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT